• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs IND : इंग्लंड विरुद्ध विजय म्हणजे वर्ल्ड कप फिक्स, टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन होणार?

March 5, 2026 by admin Leave a Comment

यजमान टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना गुरुवारी 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. न्यूझीलंडने बुधवारी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता न्यूझीलंड विरुद्ध अंतिम फेरीत कोण पोहचणार? हे भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. तसेच या सामन्याच्या निमित्ताने एक योगायोग पाहायला मिळाला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघाची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येण्याची ही एकूण आणि सलग तिसरी वेळ ठरली आहे. दोन्ही संघांची टी 20i वर्ल्ड कप उपांत्य फेरीतील आकडेवारी ही 1-1 अशी आहे. तसेच टीम इंडियाने जेव्हा जेव्हा इंग्लंडला पराभूत केलंय तेव्हा भारताने वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलंय हा इतिहास आहे. त्यामुळे यंदाही टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करुन वर्ल्ड कप विजयाचा दावा आणखी मजबूत करावा, अशीच आशा प्रत्येक भारतीय चाहत्याला आहे.

इंग्लंडने टीम इंडियाला 2022 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला होता. इंग्लंडने भारतावर 10 विकेट्सने विजय मिळवला होता. तर टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2024 च्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करत 2022 चा हिशोब चुकता केला होता. तसेच त्यानंतर अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर मात करत 2007 नंतर पहिल्यांदाच टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती.

1983 साली काय झालेलं?

कपिल देव यांनी 1983 साली टीम इंडियाला त्यांच्या कॅप्टन्सीत पहिलावहिला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. तेव्हाही भारताने इंग्लंडला उपांत्य फेरीत पराभूत केलं होतं. टीम इंडियाने तेव्हा इंग्लंडवर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. तर विंडीजवर मात करुन वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.

1987 साली वनडे वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पराभव

तत्कालिन गतविजेत्या टीम इंडियाला 1987 साली वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत इंग्लंडने पराभवाची धुळ चारली होती. त्यामुळे इतिहास पाहता जेव्हा जेव्हा टीम इंडियाने इंग्लंडला धोबीपछाड दिलाय तेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकलाय. अशात आता यंदा काय होतं? हे उभयसंघातील सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in