• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dharmendra Pradhan: बंगालमधील निवडणूक लोकांच्या हातात, सत्ता परिवर्तन होणार? केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले काय?

April 8, 2026 by admin Leave a Comment


Dharmendra Pradhan on West Bengal Election: पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी भाजप आसूसलेली आहे. त्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून भाजपने तयारी सुरू केलेली आहे. आसाम, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळम या राज्यात निवडणुकीचा बार उडालेला आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू होत आहे. त्यापूर्वीच भाजप नेत्यांची थेट विधानं समोर येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारविरोधात केंद्र सरकार असा संघर्ष गेल्या काही महिन्यात शिगेला पोहचला आहे. त्यातच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आता ही निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याचा दावा केला आहे. त्यांनी काय विश्वास व्यक्त केला आहे.

बंगालची निवडणूक लोकांच्या हाती

पश्चिम बंगालमधील झारग्राममध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठं वक्तव्य केलं. यावेळी बंगालमधील जनताच स्वतः निवडणूक लढवत असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी प्रदेशातील जनता भ्रष्टाचार, घराणेशाही आणि दडपशाही विरोधात निर्णायक मतदान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भयमुक्त आणि महिलांवरील अत्याचारमुक्त बंगालची आता गरज असल्याचे ते म्हणाले. पश्चिम बंगाल सरकार हे जनतेचे हितैषी नाही तर स्वतःच्या हिताचे काम करत असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी सुवेंद्रू अधिकारी, समीक भट्टाचार्य आणि दिलीप घोष यांची नावं घेत, ही बंगाल बाहेरील मंडळी आहेत का, असा सवाल प्रधान यांनी केला. यावेळी बंगालच्या जनतेने ठरवले आहे, भाजपलाच पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

#WATCH | Jhargram, West Bengal: Union Minister Dharmendra Pradhan says, “This time, the people of Bengal are contesting the election. This time, the people are going to cast a decisive vote against corruption, nepotism, and the oppressive system… A fear-free,… pic.twitter.com/IrVhmLSO1S

— ANI (@ANI) April 5, 2026

मालदा घटनेवर संताप

पश्चिम बंगालमधील मालदा येथे सात न्यायिक अधिकाऱ्यांना नऊ तासांहून अधिक काळ ओलीस ठेवण्यात आले होते. जमावाने त्यांना डांबून ठेवले होते. त्यावरून मोठे वादळ ओढले. मतदारांची नावं वगळण्याचा आरोप करत या अधिकाऱ्यांना ताब्यात ठेवण्यात आले होते. त्यावर भाजपने कडाडून प्रहार केला. प्रधान यांनी ही घटना अपवादा‍त्मक म्हणता येणार नहाी. या अधिकाऱ्यांना अन्न आणि पाणीही नाकारण्यात आले. मालदा-मुर्शिदाबामध्ये हिंसक कारवाया वाढल्या आहेत. हिंदू कुंटुंबावर अत्याचार, हरगोबिंदो व चंदन दास यांची निर्घृण हत्या याला पश्चिम बंगाल सरकारचे अभय असल्याचा गंभीर आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. सध्या भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात निवडणुकीपूर्वीच अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराच्या अडचणी वाढल्या? न्यायालयाकडून थेट ईव्हीएम तपासणीचे आदेश
  • Vastu Shastra : पितृदोषापासून मिळेल कायमची मुक्ती, करा वास्तुशास्त्रात सांगितलेले हे सोपे उपाय
  • Oppo ने उडवली झोप, हुबेहुब आयफोनसारखे फीचर्स असलेला स्मार्टफोन आणणार; पाहा कधी होणार लाँच?
  • Vastu Shastra : डोक्यावर प्रचंड कर्ज झालंय? मग करा कापराचे हे सोपे उपाय
  • Nashik | नाशिक पुन्हा हादरलं! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतर, प्रकरण इतकं गंभीर की…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in