• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : हुशार लोक या 6 ठिकाणी कधीच जात नाहीत, चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलंय?

March 6, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही माणसाला उपयोगी ठरतात. माणसानं कोणाशी मैत्री करावी? आणि कोणापासून लांब राहावं, माणसानं कसं जीवन जगावं आणि कसं जिवन जगू नये? माणसानं कुठे जावं आणि कुठे जाऊ नये? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात अशा 6 जागा असतात जिथे माणसाने कधीही जाऊ नये, जर अशा ठिकाणी गेलात तर भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे शहाणी माणसं नेहमी अशा जागांपासूनच दूरच राहतात. ते कधीही या ठिकाणी जात नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यानी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

रोजगाराच्या संधी – चाणक्य म्हणतात ज्या प्रदेशामध्ये कामाच्या संधी उपलब्ध नाहीत, किंवा तुम्हाला तुमच्या कामाच्या बदल्यात अपेक्षित मोबदला मिळत नाही, अशा ठिकाणी हुशार लोक कधीही जाण्याची चूक करत नाहीत. कारण त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असते की अशा ठिकाणी भविष्यात आपलं फार मोठं नुकसान होऊ शकतं.

भीतीचं वातावरण – चाणक्य म्हणतात ज्या प्रदेशात सतत भीतीचं वातावरण आहे, तेथील राजा हा अविवेकी आहे, अशा प्रदेशात जाण्याची चूक शहाणे माणसं कधीच करणार नाहीत. कारण ज्या प्रदेशात नेहमी भीतीचं वातावरण असतं, अशा राज्याचा विकास कधीही होऊ शकत नाही

कायद्याचा धाक – चाणक्य म्हणतात जिथे कायद्याचा धाक नाही, अराजक आहे. अशा ठिकाणी जाण्याची चूक शहाणे लोक कधीही करत नाहीत. कारण जिथे कायद्याचा धाक नाही अशा ठिकाणी तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो, तुमच्यासोबत अन्याय होऊ शकतो. असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मर्यादा – चाणक्य म्हणतात कोणत्याही गोष्टी एक विशिष्ट मर्यादा असते, मात्र तुम्ही जर मर्यादा सोडली तर विनाश अटळ असतो. त्यामुळे जिथे मर्यादा नाही, तिथे शहाणे लोक कधीही जात नाहीत.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक स्वार्थी असतात, ते आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी कधीही जाऊ नये, त्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं.

दानधर्म – चाणक्य म्हणतात जिथे दानधर्माची भावना नाही, एकमेकांना मदत करण्याची भावना नाही, अशा ठिकाणी शहाणे लोक कधीही जात नाहीत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
  • बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…
  • माझ्याकडे एक चिठ्ठी आली, त्यावर नारायण राणेंची सही आणि लिहिलं होतं… देवेंद्र फडणवीस यांनी तो किस्सा
  • आम्ही मुंबई पोलीस… तुमचं दहशतवाद्यांशी कनेक्शन… एक कॉल आला आणि… कल्याणमध्ये त्या घटनेने सर्वच हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in