
आचार्य चाणक्य यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही मोलाचे संदेश दिलेले आहेत. या संदेशांचे पालन केले तर जगात तुम्ही एक संपन्न आयुष्य जगू शकता. आचार्य चाणक्य यांनी पाच ठिकाणी धाडस करू नये असे सांगितले आहे. या पाच गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या..
आचार्य चाणक्य यांच्यानुसार राग आलेली व्यक्ती ही विनाशास कारण बनते. राग आलेली व्यक्ती रागाच्या भरात काहीही करू शकते. एकदा राग आला की विचार करण्याची शक्ती संपून जाते. त्यामुळेच राग आलेल्या व्यक्तीपासून दूर राहा. राग शांत झाल्यानंतर त्या व्यक्तीशी चर्चा करून वाद मिटवा.
आचर्य चाणक्य यांच्यानुसार तुमच्यासमोर स्तिती नाजूक असेल तर उगीचच काहीही करण्याचे धाडस करू नका. तुमच्याकडे किती साधने आहेत, पैसे किती आहेत याचा सारासार विचार करूनच कोणतेही काम करावे. अन्यथा ऐनवेळी तुमच्यावर मोठे संकट ओढावू शकते. योग्य रणनीती बनवल्यास तुम्हाला संकटकाळातही यश मिळू शकते.
तुमचा शत्रू फारच शक्तिशाली असेल तर त्याला थेट आव्हान देणे टाळा. याउलट बुद्धीचातुर्याने त्याच्याशी सामना करा. बुद्धीचा वापर करून त्याचा कसा पराभव करता येईल, यावर विचार करा. असे केल्याने तुमची शक्ती वाचेल सोबतच शक्तिशाली शत्रूवर तुम्हाला मात करता येईल.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.




Leave a Reply