
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प अर्थात बजेट मांडतील. इतिहासात पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला जातोय. 11 वाजता निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे देशाच्या नजरा लागल्या आहेत. शेतकऱ्यांबद्दल काही महत्वाच्या घोषणा होण्याचा अंदाज आहे. शेती बजेट 1.37 लाख कोटींपर्यंत वाढू शकतो. पीएम किसान, प्रधानमंत्री विमा योजना याकरिता निधी वाढू शकतो. गेल्या काही वर्षात महागाई प्रचंड वाढली असून त्यासंदर्भात देखील काही घोषणा केल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे निर्मला सीतारामन या तब्बल नव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत. नक्की काय स्वस्त होणार आणि काय महागणार याकडे देशाच्या नजरा आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव प्रचंड वाढत असून त्याबद्दल काही मोठा निर्णय आज अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply