
अजित पवारांच्या विमान अपघातातील निधनाच्या धक्कादायक बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या घटनेवर विश्वास ठेवणे सुरुवातीला कठीण वाटत होते. राज्याच्या राजकारणात यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक संवेदनशील, रोखठोक आणि जनसामान्यांशी जोडलेला नेता महाराष्ट्राने गमावला, अशा भावना व्यक्त होत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दिलदार, दमदार मित्र गमावल्याची भावना व्यक्त केली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मार्गदर्शक, मोठा भाऊ संबोधले. घटनेनंतर फडणवीस आणि शिंदे बारामतीमध्ये पोहोचले आहेत. विमान अपघाताची चौकशी आता DGCA आणि AIB कडून सुरू करण्यात आली आहे. अजित पवारांचे पार्थिव बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
Leave a Reply