
Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. 28 जानेवारी 2026 मध्ये अजित पवार यांनी अखेरचा श्वास घेतला. विमान अपघातात दादा यांचं निधन झालं. मुंबईहून बारामती येथे सभेला जात असताना अजित पवार यांचा विमान अपघातातन निधन झालं. अजित दादा यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तर, आता नृत्यांगना गौतमी पाटील हिने अजित पवार यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत गौतमी पाटील हिला, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव आपल्यात नाहीये, ते म्हणजे अजित दादा.’ यावर गौतमी पाटील म्हणाली, ‘माझ्या आईने मला याबद्दल सांगितलं… बातमी पाहिली तेव्हा मला मोठा धक्का बसला… माझा यावर विश्वासत बसत नाहीये… दादांच्या बाबतीत असं काही होईल असं कधीच वाटलं नव्हतं… मी दादांना कधीच भेटले नाही, पण त्यांनी कायम मला पाठींबा दिला. ते माझ्यासाठी जे काही बोलायचे, तेच माझ्यासाठी खूप होतं… दादा महाराष्ट्राचे लाडके नेते होते. पण त्यांच्यासोबत जे काही झालं, ते खूप चुकीचं झालं आहे.
पुढे गौतमी म्हणाली, ‘मला अद्यापही फार मोठा धक्का बसला आहे. त्यातून मी सावरलेली नाही. त्यांनी कायम कलाकारांना पाठिंबा दिला. त्यांच्याकडे कोणतं काम केलं घेऊन गेलं, तर ते काम 100 टक्के पूर्ण होणारच… असा प्रत्येकाचा विश्वास होता… आम्ही कधी भेटलो नाही. पण दादा माझ्याबद्दल दोन शब्द बोलले आणि तेथेच त्यांनी माझं मन जिंकलं… मला नाही वाटत महाराष्ट्र कधी त्यांना विसरु शकेल… दादा अख्ख्या महाराष्ट्राचे ते लाडके नेते होते आणि कायम असतील.’ असं देखील गौतमी पाटील म्हणाली.
अजित पवार यांचं निधन…
बुधवारी म्हणजे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातात दादा यांचं अकस्मित निधन झालं. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह, खासगी सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, फ्लाईट अटेंडेंट पिंकी माळी, पायलट सुमित कपूर आणि को – पायलट शांभवी पाठक होत्या. या सर्वांचं निधन झालं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य अद्यापही मोठ्या धक्क्यातून सावरलेलं नाही.
Leave a Reply