• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

6,4,6,4,6,4..! विजय हजारे ट्रॉफीत सरफराज खानचा विक्रम, सर्वात जलद अर्धशतक ठोकलं

January 8, 2026 by admin Leave a Comment


विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या सरफराज खानने पंजाबविरुद्ध स्फोटक अर्धशतक झळकावले. जयपूरमध्ये झालेल्या या सामन्यात पंजाबने दिलेल्या 216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 15 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुर्दैवाने या सामन्यात मुंबईचा एका धावेने पराभव झाला. (फोटो- BCCI Domestic Twitter)

सरफराज खानने फक्त 20 चेंडूंचा सामना करत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 62 धावा केल्या. सरफराजच्या अर्धशतकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने पंजाबचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने टाकलेल्या एका षटकात एकूण 30 धावा काढल्या. (Photo- PTI)

सरफराज खानने फक्त 20 चेंडूंचा सामना करत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 62 धावा केल्या. सरफराजच्या अर्धशतकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने पंजाबचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने टाकलेल्या एका षटकात एकूण 30 धावा काढल्या. (Photo- PTI)

सरफराजने अभिषेकच्या षटकात 3 षटकार आणि 3 मारले. त्याने पहिल्या चेंडूवर एक षटकार दुसऱ्या चेंडूवर चौकार तिसऱ्या चेंडूवर षटकार चौथ्या चेंडूवर चौकार पाचव्या चेंडूवरही षटकार आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारला. (फोटो- Sarfaraz Khan Instagram)

सरफराजने अभिषेकच्या षटकात 3 षटकार आणि 3 मारले. त्याने पहिल्या चेंडूवर एक षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार, पाचव्या चेंडूवरही षटकार आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारला. (फोटो- Sarfaraz Khan Instagram)

सरफराज खानने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम रचला आहे. सरफराज खानने अतित सेठचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने 2020-21 मध्ये बडोद्याकडून खेळताना छत्तीसगडविरुद्ध 16 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. (फोटो- Sarfaraz Khan Instagram)

सरफराज खानने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम रचला आहे. सरफराज खानने अतित सेठचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने 2020-21 मध्ये बडोद्याकडून खेळताना छत्तीसगडविरुद्ध 16 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. (फोटो- Sarfaraz Khan Instagram)

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सरफराज हा मुंबईचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने सहा डावांमध्ये 303 धावा केल्या आहेत. यापूर्वी त्याने गोव्याविरुद्ध 157 आणि उत्तराखंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. (फोटो- Sarfaraz Khan Instagram)

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सरफराज हा मुंबईचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने सहा डावांमध्ये 303 धावा केल्या आहेत. यापूर्वी त्याने गोव्याविरुद्ध 157 आणि उत्तराखंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. (फोटो- Sarfaraz Khan Instagram)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Australian Open 2026: कार्लोस अल्कारेजने जिंकला ऑस्ट्रेलियन ओपन किताब, नोवाक जोकोविचला नमवलं
  • WPL 2026, DC vs UPW : दिल्लीचा फिल्डिंगचा निर्णय, युपीची कामगिरी मुंबईसाठी निर्णायक, वॉरियर्स पलटणला मदत करणार?
  • या दिग्दर्शकाचा प्रत्येक सुपरहिट चित्रपट होता रिमेक, शेवटच्या चित्रपटाने कमाई केली आणि प्रेक्षकांना रडवलेही
  • मोठी बातमी! बाग्लादेशमध्ये भूकंप, भारतानं दिला जोरदार धक्का, अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला
  • संध्याकाळी घरात दिवा लावताना कधीच करू नका या चुका, अन्यथा संपूर्ण कुटुंब येईल संकटात!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in