• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

150 वेळा केला बदल, बनवण्यासाठी लागली 2 वर्षे, बाथरुममध्ये रेकॉर्ड केलेलं हे गाणं, 65 वर्षांपूर्वी आलेला 1 कोटी खर्च

February 1, 2026 by admin Leave a Comment


Bollywood Movies : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवला. अशा चित्रपटांमधील काही सीन हे इतके गाजले की त्यांची आजही चर्चा होते. असाच एक चित्रपट ज्याने बॉक्स ऑफिस गाजवलं त्यासोबत आजही ही चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला ‘मुगल-ए-आजम’ हा चित्रपट 1970 साली प्रदर्शित झाला आणि आजही तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

भव्य सेट्स, दमदार संवाद, अजरामर संगीत आणि जबरदस्त अभिनय यामुळे हा चित्रपट आजही तितकाच प्रेक्षकांना आवडतो. तब्बल 65 वर्षांपूर्वी तयार झालेल्या या ऐतिहासिक चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील प्रत्येक गाणे आजही क्लासिक मानले जाते. मात्र, त्यातील ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे विशेषतः प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवून आहे. मधुबालाच्या सौंदर्याने, लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजाने आणि नौशाद यांच्या अजरामर संगीताने सजलेले हे गाणे आजही ऐकले की अंगावर रोमांच उभे राहतात.

भव्य सेट आणि अभूतपूर्व खर्च

हे गाणे मोहन स्टुडिओमध्ये उभारण्यात आलेल्या एका भव्य सेटवर चित्रित करण्यात आले होते. हा सेट तब्बल 150 फूट लांब, 80 फूट रुंद आणि 35 फूट उंच होता. विशेष बाब म्हणजे या एका गाण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागला. त्या काळात या सेटसाठी 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला होता, जो त्या वेळच्या कोणत्याही हिंदी चित्रपटाच्या एकूण बजेटपेक्षाही जास्त होता. आजच्या काळात जर या गाण्याचे चित्रीकरण झाले असते तर त्याचा अंदाजे खर्च सुमारे 55 कोटी रुपये झाला असता असे इंडस्ट्रीतील तज्ज्ञ मानतात.

शकील बदायूनी यांनी या गाण्यासाठी अफाट मेहनत घेतली. नौशाद यांनी गाण्याच्या प्रत्येक ओळीवर बारकाईने लक्ष दिले आणि अंतिम स्वरूप देण्याआधी गीतामध्ये अनेकदा बदल करून घेतले. आश्चर्याची बाब म्हणजे, हे गाणे मंजूर होईपर्यंत त्यात सुमारे 150 वेळा एडिटिंग करण्यात आली होती.

या गाण्याला अमर करणाऱ्या लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजातून या गीताला वेगळीच उंची दिली. विशेष म्हणजे या गाण्यात इको इफेक्ट वापरण्यात आला होता, जो त्या काळात अत्यंत दुर्मिळ मानला जात होता. नौशाद काहीतरी वेगळे करायचे ठरवले होते. त्यामुळे त्यांनी लता मंगेशकर यांना थेट बाथरूम स्टुडिओमध्ये गाणे रेकॉर्ड करण्यास सांगितले, जेणेकरून गाण्याला नैसर्गिक आणि खोल इको इफेक्ट मिळू शकेल.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…
  • Vastu Shastra : घराला नजर लागलीये? सर्व गोष्टी वाईटच घडतायेत? मग करा वास्तुशास्त्रातील हा सर्वात प्रभावी उपाय
  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in