
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी एक-दोन चित्रपटांनंतर अचानक इंडस्ट्री सोडून वेगळ्या आयुष्याचा मार्ग निवडला. अशाच एका अभिनेत्रीची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने एकच चित्रपट करूनही आज त्या हजारो कोटींच्या संपत्तीच्या मालकीण आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून ती गायक्षी जोशी आहे. 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'स्वदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता.
चित्रपटात गायत्री जोशी आणि शाहरुख खान यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मात्र, या चित्रपटानंतर गायत्री जोशीने थेट इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला.
‘स्वदेस’च्या रिलीजनंतर 2005 मध्ये त्यांनी उद्योगपती विकास ओबेरॉय यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी पूर्णपणे चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आज ती हजारो कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
विकास ओबेरॉय हे भारतातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक असून ते रिअल इस्टेट क्षेत्रातील Oberoi Realty या कंपनीचे प्रमुख आहेत.
माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 50 हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे गायत्री जोशी देखील या प्रचंड संपत्तीची मालकीण मानली जाते.





Leave a Reply