• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी टीम इंडियाची साथ का सोडली? बीसीसीआय निशाण्यावर

March 4, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. 5 मार्च रोजी टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे हा हायव्होल्टेज सामना असेल यात काही शंका नाही. सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना खेळून टीम इंडिया कोलकात्याहून मुंबईला आली आहे. पण भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव, अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे टीम इंडियाची साथ सोडून घरी गेले. मुंबई एअरपोर्टवरून एक व्हिडीओ समोर आला आहे. यात सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे वगळून इतर खेळाडू बसमधून हॉटेलवर गेले. तर हे तिघे आपआपल्या खासगी गाडीतून घरी गेले. हे तिन्ही खेळाडू मुंबईत राहतात. त्यामुळे हॉटेलऐवजी त्यांनी घरी जाणं पसंत केले. पण आता त्यांच्या घरी जाण्यावर क्रीडाप्रेमींनी आक्षेप नोंदवला आहे.

उपांत्य फेरीचा सामना दिग्गज इंग्लंड संघाविरुद्ध होत आहे. असं असताना सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे टीम इंडियाची साथ सोडून का गेले? त्यांचं घर मुंबईत असलं तरी ते हॉटेलमध्ये इतर खेळाडूंसोबत राहू शकले असते. अखेर या तिघांना बीसीसीआयने परवानगी का दिली? असे प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. जर उपांत्य फेरीचं गणित चुकलं तर मात्र हे प्रकरण पुढे येईल. कारण भारतीय संघ जेतेपदापासून फक्त 2 विजय दूर आहे. अशा स्थितीत टीम इंडियाने एकत्र राहणं आवश्यक आहे. खेळाडूंचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी आणखी वाढते.

Suryakumar Yadav, Hardik Pandya, and Shivam Dube live in Mumbai, so they left the team and went to their own homes in their personal cars instead of staying with the team.

Is there no rule in BCCI that even if a match is being played in the city where a player lives, he still… pic.twitter.com/tTqDAKv4Mp

— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 2, 2026

सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे दिग्गज खेळाडू आहेत. या दोघांनी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत काही सामने जिंकवले आहेत. पण त्यांची कामगिरी सातत्यपूर्ण नाही. हार्दिक पांड्या गोलंदाज म्हणून खूपच महागडा ठरला आहे. त्याने सर्वाधिक षटकार दिले आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवही फार काही ग्रेट करू शकलेला नाही. अमेरिकेविरुद्ध नाबाद 84 धावांची खेळी केली. त्यानंतर एकही अर्धशतक ठोकलेलं नाही. त्याने तीन वेळा 30हून अधिक धावा केल्या. पण मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला. उलट मोक्याच्या क्षणी विकेट टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत
  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in