• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सूर्यकुमार यादव संतापला, थेट वाद, तो धक्कादायक अखेर पुढे, भारतीय क्रिकेट संघात…

February 24, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी T-20 वर्ल्ड कप 2026 ची भारताची दमदार सुरूवात झाली. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात भारताला दारून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचे खापर ईशान किसन, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांच्यावर फोडण्यात आले. दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत सामना खेळत असताना तिन्ही खेळाडूंचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. दक्षिण आफ्रिकेचा संघ तडगा असतानाही त्यांना हलक्या घेण्याची चूक भारतीय क्रिकेटर्सने केली. पावरप्लेमध्ये दणादण एका मागून एक अशा तीन विकेट भारताच्या पडल्या आणि तिथेच मोठा झटका लागला. शिवम दुबे याने धमाकेदार खेळी खेळली पण त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. शेवटी त्यानेही हात टेकले. आता पुढील दोन सामने भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावी लागणार आहेत, दुसरा तिसरा कोणताही पर्याय भारताकडे उपलब्धच नाही. गंभीरने आखलेली रणनीतीही फेल गेल्याचे बोलले जात आहे.

हा फक्त एका सामन्यातील पराभव नाही तर हा भारतीय संघासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघ तणावात बघायला मिळाला. यादरम्याचन सूर्यकुमार यादव याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सूर्या चांगलाच गंभीर दिसत असून तो सपोर्ट स्टॉफ आणि गाैतम गंभीरसोबत चर्चा करताना दिसतोय, असे सांगितले जातंय की, त्याचा यादरम्यान वादही झाला.

76 धावांनी दक्षिण आफ्रिकेकडून पराभव हा भारतीय संघासाठी मानहानीकारक नक्कीच आहे. या पराभवानंतर सूर्यकुमार यादव नाराज झाला. फक्त नाराजच नाही तर व्हायरल व्हिडीओमध्ये तो डगआऊटमध्ये सपोर्ट स्टाफ आणि गाैतम गंभीर यांच्यासोबत चर्चा करताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावरील टेन्शन स्पष्टपणे दिसत आहे.

After losing the match against South Africa, Suryakumar Yadav was seen looking quite upset in the dugout. He appeared to be having a serious discussion with Gautam Gambhir and the rest of the support staff. pic.twitter.com/FDgxSGKIN4

— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) February 22, 2026

26 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वेसोबत सामना आहे, हा सामना भारताला जिंकावाच लागेल. यासोबत 1 मार्च 2026 रोजी भारतीय संघाचा वेस्ट इंडिजसोबतही सामना आहे. हा सामना देखील भारताला जिंकावा लागेल. हे दोन्ही सामने जिंकल्याशिवाय भारताकडे दुसरा काहीही पर्याय नाही. दक्षिण आफ्रिकेविरोधातच्या सामन्यातील पराभवानंतर स्पष्ट बोलताना सर्यकुमार यादव दिसला. क्षेत्ररक्षण असो किंवा फलंदाजी सर्वकाही चांगलेच पुढील सामन्यात करावे, असे सूर्याने म्हटले.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?
  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in