• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शेतकरी कर्जमाफीची घोषणा होताच बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया, बोलावली महत्त्वाची बैठक

March 6, 2026 by admin Leave a Comment


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे. यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतच कर्ज थकीत आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

मी सरकारचे आभार मानतो – बच्चू कडू

काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केले होते. आज सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर बच्चू कडू म्हणाले की, ‘देवा भाऊंनी आज कर्जमाफीची घोषणा केली त्यांचे मी आभार मानतो, पण त्यामध्ये काही त्रुटी आहे. खरं तर पात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे होती. दुष्काळात होरपळलेल्या चालू कर्जदारांची कर्जमाफी झाली पाहिजे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दीड लाख रुपये दिले पाहिजे.’

बच्चू कडू यांनी बोलावली बैठक

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘आम्ही कर्जमाफीसाठी मुंबईला गेलो तेव्हा आमच्यावर खूप टीका झाली. त्या टीकाकारांना आता उत्तर मिळला आहे, कर्जमाफीची घोषणा सरकारने केली आहे. कर्जमाफी पासून दूर जाणाऱ्या सरकारला कर्जमाफीची घोषणा करायला आम्ही भाग पाडले. 14 किंवा 15 तारखेला राजू शेट्टी, अजित नवले, महादेव जानकर, रविकांत तुपकर यांच्यासह सर्व शेतकरी नेत्यांसोबत बैठक घेणार आणि सरकार समोर कसं जायचं याचा विचार करू.’

शेतकऱ्यांचा विश्वासघात केला – राजू शेट्टी

सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवर बोलताना राजू शेट्टी यांनी म्हटलं की, ‘शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही तकलादू आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. ऑक्टोबर महिन्यात आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. बहुतांश शेतकऱ्यांची पीक कर्जे ही साडेतीन ते चार लाख इतकी आहेत. दोन लाखांच्या वरची रक्कम भरल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मेटाकुटीला आलेला शेतकरी दोन लाखांच्या वरची रक्कम कशी भरणार हा प्रश्न आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे जो शेतकरी नियमित कर्ज भरत होता तो देखील आता थकीत झाला आहे. सरकारने केलेली ही कर्जमाफी बँकांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी आहे असा प्रश्न पडतो.’

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हाळ्यात काकडीचे सेवन म्हणजे आरोग्यासाठी वरदान, ‘या’ 4 पदार्थांसोबत खाल्ल्यास मिळेल दुप्पट फायदा
  • Gold Rate : आता सोनं खरेदी करणं अशक्य! 10 ग्रॅमचा भाव तब्बल….किंमत पाहून थक्क व्हाल!
  • आतापर्यंत एकही फ्लॉप चित्रपट न देणारा अभिनेता, लुकमुळे शाळेत सहन करायचा टोमणे
  • IPL 2026: वैभव सूर्यवंशी जाणीवपूर्वक करतोय दिग्गज गोलंदाजांना लक्ष्य! असं कारण तर नाही ना?
  • Photo : असीम मुनीरसोबत असणारी महिला कोण? संपूर्ण जगात का होतेय चर्चा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in