• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शाळा, कॉलेजला सुट्टी, सर्व परीक्षा रद्द, इंटरनेट सेवा बंद, जम्मू-काश्मीरमधील सरकारचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

March 6, 2026 by admin Leave a Comment


इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या संताप आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर चौथ्या दिवशीही प्रशासनाने कडक खबरदारीचे उपाय कायम ठेवले आहेत. संभाव्य अशांतता रोखण्यासाठी 5 मार्च रोजीही काश्मीर खोऱ्यातील अनेक संवेदनशील भागांमध्ये निर्बंध लागू ठेवण्यात आले आहेत.

प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शिक्षण संस्थांनाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठे किमान शनिवार 7 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. University of Kashmir आणि Central University of Kashmir यांसारख्या प्रमुख शैक्षणिक संस्थांनीही सर्व वर्ग स्थगित केले असून नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

इंटरनेट सेवा बंद

अफवा आणि चुकीची माहिती पसरू नये यासाठी इंटरनेट सेवांवरही निर्बंध लावण्यात आले आहेत. हाय-स्पीड मोबाईल डेटा सेवा (4G/5G) बंद करण्यात आले असून पोस्टपेड कनेक्शनसाठी इंटरनेटचा वेग 2G पर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. विशेषतः श्रीनगरमधील काही जुन्या शहरात हा निर्णय लागू करण्यात आला आहे. श्रीनगरमधील मध्यवर्ती भाग लाल चौक येथे असलेले ऐतिहासिक घंटा घर परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. येथील पादचारी आणि वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आणि निदर्शने पाहायला मिळाली. हजारो लोक श्रीनगरमधील ऐतिहासिक घंटाघर परिसरात जमले आणि या हत्येचा तीव्र निषेध व्यक्त केला. सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात अमेरिकेचे आणि इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर हत्या प्रकरण दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

जनतेला शांतता राखण्याचे आवाहन

अमेरिकाविरोधी आणि इस्रायलविरोधी मोठ्या मोर्चांमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला कडक निर्बंध लागू करावे लागले. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी श्रीनगरमध्ये धार्मिक नेते आणि नागरी समाजाच्या प्रतिनिधींसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणमध्ये झालेल्या अमेरिका-इस्रायल हवाई हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

तसेच त्यांनी जम्मू-काश्मीरमधील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच लोकांनी आपला संताप किंवा दु:ख कायदेशीर आणि शांततामय मार्गाने व्यक्त करावे असेही त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in