
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 च्या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्याच्या पूर्व विभागातील विदर्भात नैसर्गिक खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या भागाच्या विकासासाठी आशियाई विकास बँकेच्या साहाय्याने 4500 कोटी रुपयांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात नागपूर-गोंदिया-भंडारा-गडचिरोली आणि नागपूर-चंद्रपूर या द्रुतगती महामार्गांचा समावेश आहे.
राज्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर यांसारख्या उन्नत मार्गांना मंजुरी मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे ग्रीनफिल्ड महामार्ग आणि विमानतळाच्या कामांना गती देण्यात येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा 25 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि सातपाटी येथील आधुनिक मत्स्यबंदर प्रकल्पांमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल. ऊर्जा क्षेत्रात 2047 पर्यंत 75 टक्के स्वच्छ ऊर्जा मिळवण्याचे उद्दिष्ट असून, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी 20,000 कोटी रुपये निधी आरक्षित केला आहे.
Leave a Reply