• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लोक मला कुचका-मेला म्हणतात, दगडाने ठेचून मारण्याची धमकी देतात..; मराठी अभिनेत्यावर का आली अशी वेळ?

March 22, 2026 by admin Leave a Comment


पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना अनेकदा खऱ्या आयुष्यातही प्रेक्षकांच्या रागाला सामोरं जावं लागतं. परंतु एका अर्थी हीच त्यांच्या उत्तम कामाची पोचपावती असते. अभिनेते महेश कोकाटे हे ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ या मालिकेत गंगाधर शास्त्रींच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याआधी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या गाजलेल्या मालिकेत त्यांनी अनाजीपंतांची भूमिका साकारली होती. या नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला. “लोक मला बघितल्यानंतर शिव्या घालतात, कुचका-मेला म्हणतात, पण हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे,” असं ते म्हणाले. महेश कोकाटे यांनी विविध मराठी मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत महेश कोकाटे म्हणाले, “शिव्या हेच माझ्या कामाचं सर्टिफिकेट आहे. लोक मला बघितल्यानंतर शिव्या घालतात, कुचका-मेला म्हणतात, हाच माझा अवॉर्ड आहे. अनाजीपंतांच्या भूमिकेपासून मला ही सवय झालीच आहे. माझ्या आयुष्यातली पहिली निगेटिव्हि भूमिका ही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अनाजीपंतांचीच होती. त्यानंतर ‘अगंबाई सासूबाई’मध्येही माझी नकारात्मक भूमिका होती. त्यानंतरही दोन-तीन मालिकांमध्ये तशाच पद्धतीच्या भूमिका झाल्या. तेव्हा मला जाणवलं की अरे मी खूपच निगेटिव्ह भूमिका करू लागलो आहे. त्यानंतर मध्यंतरी अबोली या मालिकेत सकारात्मक भूमिका साकारली, पण त्यानंतर पुन्हा खलनायकी भूमिकांकडे वळलो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Vanita Shantaram Jadhav (@durgvedarohit)

“निगेटिव्ह भूमिकेसाठी अभिनेत्याचा खूप कस लागतो. कारण खूप विचार करावा लागतो. अती केल्यानेही ती भूमिका चांगली होऊ शकत नाही. खूप त्रासही होतो आणि तेवढीच मेहनतसुद्धा घ्यावी लागते. मालिकेच्या प्रत्येक एपिसोडवरून प्रेक्षकांचे मेसेज यायचे. ‘तू फक्त पगडी घालून बाहेर ये, तुला दगडाने चेचलं नाही तर बघ..’ अशा शब्दांत ते राग व्यक्त करायचे. काहीजण तर अक्षरश: शिवीगाळ करायचे. अभिनेत्री अश्विनी महांगडेनं तर मला सांगितलं होतं की, तुम्ही साताऱ्याला जाऊ नका. तिकडची लोकं तर तुम्हाला दगडाने चेचणार आहेत,” अशा शब्दांत त्यांनी अनुभव सांगितला.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in