
आखाती देशांमधील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे भारतात आणि महाराष्ट्रात त्याचे परिणाम जाणवत आहेत. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात असलेल्या नऊ ऑटो एलपीजी पंपांपैकी सात पंपांवरील गॅस संपल्याची माहिती आहे. उपलब्ध असलेल्या पंपांवर गॅस भरण्यासाठी रिक्षाचालकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांत ऑटो एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी 61 रुपये प्रति लिटर असलेला गॅस आता जवळपास 75 रुपये प्रति लिटर झाला आहे, म्हणजेच तब्बल 14 रुपयांची दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे आणि तुटवड्यामुळे रिक्षाचालक मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर परिस्थितीत सरकारने तातडीने तोडगा काढून मार्ग काढावा, अशी मागणी छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांकडून होत आहे.
Leave a Reply