• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

युतीचं कुठं घडलंय, कुठे बिघडलंय… पाहा 29 महापालिकेची डिटेल्स

December 30, 2025 by admin Leave a Comment


राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज यासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी राज्यात वेगवेगळी समीकरणे पहायला मिळत आहेत. काही ठिकाणी महामयुतीतील पक्षांनी युती केली आहे, तर काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनीही काही ठिकाणी आघाडी केली आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक ठिकाणी युती आणि आघाडीसाठी मोठ्या प्रमाणात बैठका झाल्या, मात्र तोडगा निघालेला नाही. आज आपण भाजप आणि शिवसेनेची युती कोणत्या महानगर पालिकेत झाली आणि कोणत्या महानगर पालिकेत तुटली याबाबत माहिती जाणून घेऊयात.

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने युती केली आहे. मुंबईतील 227 पैकी 90 जागांवर शिवसेना लढणार आहे, तर 137 जागांवर भाजप मैदानात उतरणार आहे. तसेच दोन्ही पक्ष आपल्या मित्र पक्षांना आपल्याला कोट्यातून जागा देणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. मुंबईसह ठाणे, जळगाव, नागपूर या प्रमुख महानगर पालिकांच्या निवडणुकीतही या दोन्ही पक्षांनी युती केली आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईसह प्रमुख महानगर पालिकांच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप-शिवसेना युती नसलेल्या महापालिका

  1. पुणे
  2. छत्रपती संभाजी नगर
  3. नाशिक
  4. नांदेड
  5. अमरावती
  6. मालेगाव
  7. अकोला
  8. मीरा-भाईंदर
  9. नवी मुंबई
  10. धुळे
  11. उल्हासनगर
  12. सांगली
  13. जालना
  14. पिंपरी चिंचवड
  15. परभणी
  16. सोलापूर
  17. लातूर
  18. अहिल्यागर

भाजप-सेना या जागांवर एकत्र लढणार

  1. मुंबई
  2. ठाणे
  3. जळगाव
  4. पनवेल
  5. नागपुर
  6. भिवंडी
  7. कोल्हापूर
  8. चंद्रपूर
  9. वसई विरार
  10. कल्याण डोंबिवली
  11. इचलकरंजी

मुंबईत शिवसेना मनसेची युती

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे. तर काँग्रेसने वंचितसोबत युती केली आहे. या सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. आता उद्या अर्जांची छाणनी होणार आहे, तर 2 तारखेपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. 3 तारखेला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होऊन चिन्हवाटप होणार आहे. 15 तारखेला मतदान होऊन 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चीनमध्ये यू-टर्न इंडिकेटरसह येणार वाहने, ट्रॅफिक कोंडी टाळण्याचा एक चांगला मार्ग
  • चीनमध्ये यू-टर्न इंडिकेटरसह येणार वाहने, ट्रॅफिक कोंडी टाळण्याचा एक चांगला मार्ग
  • Jalna Local Body Elections: जालन्यात भाजपच्या माजी आमदारांसमोर काँग्रेसच्या माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
  • शरद पवारांना सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याचा शेवटच्या क्षणी थेट राजीनामा; पक्षात मोठी खळबळ!
  • Ajit Pawar NCP : दादांच्या राष्ट्रवादीकडून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट, उमेदवारांच्या निवड प्रक्रियेवर सवाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in