
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप-महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत विजय संपादन केला आहे. भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या असून, महायुतीचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या निकालांमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने लक्षवेधक कामगिरी करत आपला ठसा उमटवला आहे. ठाकरेंची शिवसेना मुंबईत दुसऱ्या क्रमांकावर राहिली असून, त्यांना 65 नगरसेवकांसह यश मिळाले आहे.
निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. “कागदावर शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाहीत,” असे ठामपणे ठाकरेंनी सांगितले. त्यांनी मागील तीन निवडणुकांचे रेकॉर्ड तोडल्याचा दावाही केला. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या, तर काँग्रेसने 24 जागा जिंकल्या. मतदारांनी आपल्याला भरभरून मतदान केल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. या निकालाने मुंबईच्या राजकारणात ठाकरे गटाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
Leave a Reply