• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मराठमोळ्या अभिनेत्रीचं खोट्या प्रेमामुळे आयुष्य उद्ध्वस्त… काही वर्षात नवऱ्याने ही सोडली साथ

February 22, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. प्रेम, लग्न, घटस्फोट आणि फसवणूक… या कारणांमुळे कायम चर्चेत असलेल्या अभिनेत्री कधी गायब होतात कळत देखील नाही. असंच काही मराठमोळ्य अभिनेत्रीसोबत देखील झालं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीची ओळख विवाहित दिग्दर्शकासोबत होते. सुरुवातीला दिग्दर्शकामुळे अभिनेत्रीला अनेक सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळते. पण त्यांच्या नात्याचा अंत झाल्यानंतर अभिनेत्री आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यानंतर ती लग्न करते, पण नवऱ्याची साथ देखील आयुष्यभर मिळत नाही… अखेर आज अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आहे.

अभिनेता आमिर खान आणि जॅकी श्रॉफ स्टारर ‘रंगीला’ सिनेमामुळे उर्मिला हिने प्रेकक्षांमध्ये एक वेगळी ओळख मिळाली… सिनेमाचं दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलेलं. ‘रंगिला’ सिनेमाच्या यशानंतर, वर्मा यांच्या प्रत्येक सिनेमात अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका बजावली. 90 च्या दशकात उर्मिला हिच्यासमोर अनेक लोकप्रिय अभिनेत्री देखील फिक्या पडल्या होत्या.

राम गोपाल वर्मा यांच्यावर उर्मिला हिचा जीव जडलेला, याच कारणामुळे, दिग्दर्शकाने देखील दौड, सत्या, कौन, मस्त, जंगल, प्यार तूने क्या किया, भूत आणि एक हसीना थी… यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये उर्मिला हिला संधी दिला आणि तिने देखील दमदार भूमिका बजावली. अशात दोघांच्या नात्याची चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये वाऱ्यासारखी पसरली.

सांगायचं झालं तर, उर्मिला हिने अधिक सिनेमा राम गोपाल वर्मा यांच्यासोबतच केले आणि हिच अभिनेत्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. कारण जेव्हा राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीला दोघांच्या अफेअफबद्दल कळलं तेव्हा दिग्दर्शकाच्या पत्नीने अभिनेत्रीच्या कानशिलात लगावली.. असं देखील सांगण्यात आलं आहे.

त्यानंतर उर्मिला आणि राम गोपाल वर्मा कोणत्याच सिनेमात एकत्र दिसले नाही. अशात अन्य दिग्दर्शकांनी देखील उर्मिला हिच्यासोबत काम करण्यास नकार दिला आणि अभिनेत्रीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं.

त्यानंतर 2014 मध्ये उर्मिला हिने स्वतःपेक्षा 10 वर्ष लहान मॉडेल आणि उद्योजक मोहसिन अख्तर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 8 वर्षांनंतर उर्मीला आणि मोहसिन यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
  • मुलांसोबत ती घर सोडून गेली अन् मी..; रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबाबत आमिर खानचा खुलासा
  • चाणाक्य सांगतात, ‘या’ गोष्टी करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप कराल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in