• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मधमाशीच्या दंशाने ज्येष्ठ अंपायरचा मृत्यू, मधमाशांचा दंश इतका खतरनाक का ?

February 19, 2026 by admin Leave a Comment


मधमाशांच्या जवळपासही जायला लोक घाबरत असतात. खास करुन जंगलात वगैर प्रवास करत असताना पर्यटकांना मधमाशांपासून प्रचंड धोका असतो. परंतू उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बुधवारी KDMA क्रिक्रेट लीगचा सामना सुरु असताना ज्येष्ठ किक्रेट समालोचक माणिक गुप्ता यांच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले आहे. त्यामुळे मधमाशांच्या हल्ल्यातील अशा प्रकारे झालेला हा मृत्यू चर्चेचा विषय बनला आहे. याआधी अभिनेत्री करिष्मा कपूर हीचा पती संजय कपूर यांचा लंडन येथे मधमाशी चावल्यानंतर मृत्यू झाला होता. काय आहे यामागे कारण वाचूयात ?

क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार मधमाशांचा दंश केवळ वेदना देत नाही. तर मृत्यूचेही कारण बनू शकतो. याची सुरुवात जेव्हा होते तेव्हा मधमाशी शरीरावर दंश करते त्यावेळी तिचे विष त्या शरीरात सोडते. काही प्रकरणात तिचे विष शरीरात वेगाने रिएक्ट करते. एलर्जीच्या रुपात ते दिसते त्यावेळी डॉक्टरांची मदत घेणे गरजेचे असते.

मधमाशा दंश का मारतात ?

मधमाशा उन्हाळ्यात सर्वात एक्टीव्ह असतात. किंवा जेथे वर्षभर तापमान एक सारखे उष्ण असते ते मधमाशा सक्रीय असतात. जेव्हा त्यांना संकट वाटते किंवा त्यांच्या पोळ्याला कोणतीही धक्का पोहचवते तेव्हा ती संरक्षणासाठी हल्ला करते. मोठी झाडे आणि फुले तसेच पाण्याचे स्रोत जिथे जास्त तेथे मधमाशांचे वास्तव्य असते.

एकदा दंश मारल्यानंतर ती मधमाशी आपल्या इतर सहकाऱ्यांना बोलवते. तिचा पाठी असलेला करवती सारखा टोकरी काटा ती माणसाच्या शरीरात टोचते.करवती सारखे दात असल्याने हा काटा उलटा बाहेर निघत नाही, मासांत अडकून बसतो. मधमाशीचे पोटातून हा दंश येत असल्याने मधमाशीनंतर बहुतांशी वेळा मरते.

Honey Bee Sting Death

दंश बनतो मृत्यूचे कारण ?

मधमाशी चावल्यानंतर अनेक प्रकारची लक्षण दिसतात. दंशाच्या जागी जळजळ होते. तीव्र वेदना होतात. दंशामुळे आजूबाजूच्या त्वचेचा रंग बदलतो. प्रभावित जागी सूज आणि खाज येते आणि उलटी आणि जुलाब होतात.

जेव्हा एलर्जी गंभीर असते तेव्हा श्वास घेण्यात अडचण होते. ब्लड प्रेशर घसरु लागते आणि हृदयाची धडधड थांबू शकते. ज्यांना आधीच हृदयाचा आजार असेल त्यांच्यासाठी ही अवघड स्थिती होते. अशा प्रकरणात किडनी फेल होऊ शकते. शरीरातील काही अवयव काम करत नाहीत. जास्त मधमाशांनी दंश केला तर मृत्यूचा धोका आणखीन वाढतो.

मधमाशाचे विष शरीरात किती वेगाने रिएक्शन करते त्यावर जोखीम ठरते. परंतू प्रत्येकाचे शरीर त्यावर पटकन रिएक्ट होईल यावर धोका अवलंबून असतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका
  • RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका
  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in