• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मग नियमांची गरज काय? ही कसली थिअरी आहे? राहुल गांधींचं नाव घेत प्रल्हाद जोशींचा सवाल

March 9, 2026 by admin Leave a Comment


राजधानी नवी दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी लोकसभेचे कामकाज संपले. विरोधकांनी अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धांवरून गोंधळ घातला. युद्धोत्तर पश्चिम आशियातील परिस्थितीचा भारतावर काय परिणाम झाला यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. यावेळी सरकारने, ‘सभापती ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. आम्ही त्यावर चर्चा करण्यास तयार आहोत’, असे विरोधकांनी सांगितले. मात्र यावर चर्चा न करता विरोधकांनी आणखी एक प्रस्ताव मांडला, ज्याला परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. त्यानंतर सभागृह मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यानंतर आता मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अविश्वास प्रस्तावावर भाष्य केले आहे.

प्रल्हाद जोशी काय म्हणाले?

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावाबाबत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, ‘आजच्या कामकाजाच्या यादीत स्पष्टपणे लिहिले आहे की आपण यावर चर्चा करणार आहोत. त्यांना प्रस्ताव मांडावा लागेल. प्रक्रिया काय आहे? जेव्हा प्रस्ताव मांडला जातो, तेव्हा त्याच्या समर्थनार्थ 50 सदस्य उभे राहणे आवश्यक असते.

आज अध्यक्षस्थानी बसलेल्या जगदंबिका पाल यांनी वारंवार सांगितले की, जर तुम्हाला प्रस्ताव मांडायचा असेल तर मी चर्चेला परवानगी देतो. जेव्हा स्पीकरविरोधातील अविश्वास प्रस्ताव अजेंड्यावर आहे, तेव्हा मध्येच दुसरा प्रस्ताव किंवा दुसरा स्थगन प्रस्ताव कसा आणू शकता? काही नियम आहेत की नाहीत? काही संविधान नाही का?

#WATCH | Delhi: On the no-confidence motion against Lok Sabha Speaker Om Birla, Union Minister Pralhad Joshi says, “Today, it’s clearly written in the list of businesses that we will discuss it. They have to move the resolution. What is the procedure? When the resolution is… pic.twitter.com/uflYGO9PRi

— ANI (@ANI) March 9, 2026

… तर नियमांची काय गरज?

पुढे बोलताना जोशी यांनी म्हटले की, ‘जर राहुल गांधी सांगतात तसं आपल्याला सभागृह चालवायचं असेल, तर मग नियमांची गरजच काय? आधी मागणी करायची आणि नंतर अडथळा आणायचा ही कसली थिअरी आहे? मी जेव्हा संसदीय कामकाज मंत्री होतो, तेव्हा असे अनेकदा घडत असे. त्यांना वाटते की ते जे काही म्हणतात तेच नियम आहेत. ज्या कोणत्या विषयावर चर्चा व्हायची आहे, ती आधी बीएसी (Business Advisory Committee) मध्ये ठरवली पाहिजे.’





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in