• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भीषण अग्नितांडव… 15 तासांनंतरही आग अनियंत्रित… 8 जणांचा मृत्यू तर, 20 बेपत्ता

January 27, 2026 by admin Leave a Comment


प्रजासत्ताक दिनाची सकाळ अत्यंत भयानक ठरली. कारखाना आणि डेकोरेटर गोदामला लागलेल्या आगीने काही तासांत भीषण रुप घेतलं. गेल्या 15 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण आग नियंत्रणात आली नसल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अग्नीतांडवमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण बेपत्ता आहे… बेपत्ता लोकांचे नातेवाईक आता पोलिसांत तक्रार दाखल करत आहेत. ही भीषण आग कोलकात्याच्या दक्षिणेकडील बाहेरील आनंदपूर येथील एका सुक्या अन्नाच्या गोदामात सोमवारी पहाटे लागल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी बारा अग्निशमन दलाच्या गाड्या अथक परिश्रम घेत आहेत. गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ असल्याने आग वेगाने पसरली.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आग इतकी भीषण होती की आत अडकलेल्या लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेले मृतदेह इतके जळालेले आहेत की त्यांची ओळख पटवणे सध्या अशक्य आहे. ढिगारा साफ करण्यासाठी जेसीबी मशीन आणि रोबोटिक कॅमेरे वापरले जात आहेत.

 

#WATCH | West Bengal | Fire broke out in a manufacturing unit in Anandapur, Kolkata. Efforts to douse the fire are underway. pic.twitter.com/YhAhHfPlT4

— ANI (@ANI) January 26, 2026

बेपत्ता कर्मचारी पंकज हलदार यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 3:30 वाजता पंकजने फोनवरून सांगितले होतं की, “कारखान्याचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद आहे आणि आम्ही भिंत तोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत.”

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मोमो फॅक्टरीसह गोदामात देखील रात्रीच्या शिफ्टचं काम सुरू होतं. सोमवारी मध्यरात्री जवळपास 3 वाजेपर्यंत काम सुरु होता. कारखान्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या पाम तेल आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमुळे आग अधिक भडकली, ज्यामुळे स्फोट झाले आणि आग लागली. अरुंद रस्ते आणि दाट धुरामुळे बचाव कार्यात लक्षणीय अडथळा येत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

मध्यरात्री लागलेली आगीवर सकाळी 11 वाजेपर्यंत नियंत्रण मिळवण्यात आलं. पण अद्यापही काही ठिकाणी आग लागलेली असून विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री अरुप बिस्वास यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतांच्या कुटुंबियांना सांत्वन दिलं. त्यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला आणि बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबियांशी देखील संवाद साधला.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tuesday Rules : मंगळवारी चुकूनही विकत घेऊ नका या गोष्टी, आयुष्य होईल बरबाद..
  • Share Market: भारत-अमेरिका व्यापार कराराने बाजाराला आनंदाचे भरते; Sensex आणि Nifty ची रॉकेट भरारी
  • अजित पवार कारने जाण्याऐवजी विमानाने का गेले? आदल्या रात्री काय घडलं? ड्राइव्हरने सर्वच सांगितलं
  • US-India Trade Deal: एक फोन आणि सूत्रं फिरली, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चेनंतर घटले टॅरिफ, रात्रीतूनच बदलल्या या 5 गोष्टी
  • भिंतीवर फ्रेम सजविण्याची योग्य पद्धत कोणती? लक्झरी लूकसाठी फॉलो करा 5 टिप्स

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in