
राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला. काही दिवसांपूर्वीच थंडीचा कडाका बघायला मिळाला तर आता उकाडा जाणवत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील तापमानात दररोज मोठे बदल होताना दिसत आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी काही भागात पाऊसही झाला. आता थंडी पूर्णपणे गायब झाली असून उकाडा जाणू लागला. राजस्थानच्या सिकार येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. सिकारमध्ये 4.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली. धुळ्यात 11 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. कोकणाती भिरा येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. भिरा येथे उच्चांकी 38 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यात जरी उकाडा जाणवत असला तरीही काही राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या भागात दाट धुके पडेल. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरिणाया या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. यासोबतच केरळ आणि तामिळनाडूकरिता पुढील 24 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला. हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळी आणि संध्याकाळी तीव्र थंडी जाणेल तर दुपारी उकाड्यापासून दिलासा मिळेल. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 6 फेब्रुवारी रोजी दिल्लीत अंशतः ढगाळ आकाश राहील. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वायू प्रदूषण हा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. आता दिल्लीमध्ये प्रदूषणात मोठ्या घट झाली. मुंबईसह दिल्लीतील वायू प्रदूषण मोठा मुद्दा बसले होते. विषारी हवा झाली होती.
डिसेंबर महिन्यात राज्यात थंडी कायम राहिली. मात्र, जानेवारी महिन्यात थंडी उकाडा असे समीकरणे बघायला मिळाले. फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यातून थंडी गायब झाल्याचे दिसतंय. मध्येच पाऊस येतो तर कधी उकाडा जाणवतो. आज दिवसभर राज्यात उकाडा जाणवेल. यासोबतच पावसालाही पोषक वातावरण राज्यात आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असूनही राज्यात शीतलहरी दाखल होत नाहीत.
Leave a Reply