• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतासाठी गुड न्यूज… इराण-अमेरिका युद्ध संपताच घरगुती गॅस सिलेंडर… काय आहे मोठी अपडेट?

April 8, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराण यांच्यातील सीजफायरनंतर, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती पूर्ववत होऊ शकते. जेथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दोन आठवडे युद्धविरामाची घोषणा केली आहे, तेथे इराणने देखील होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली आहे. सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात देखील इंधनाचा तुडवडा भासले. अशात, पश्चिम आशियातील तणावामुळे गंभीर इंधन संकटाचा सामना करणाऱ्या भारतासाठी ही घोषणा एक दिलासादायक बातमी ठरू शकते.

भारतीयांना कधी मिळणार दिलासा?

डोनाल्ड ट्रंप म्हणाले, ‘पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाद शरीफ आणि फिल्ड मार्शल असीर मुनीर यांच्यासोबत झालेल्या चर्चांच्या आधारावर, त्यांनी मला आज रात्री इराणवर नियोजित असलेला विनाशकारी हल्ला थांबवण्यासाठी विनंती केली. एवंढच नाही तर, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ आणि सुरक्षितपणे खुली करण्याच्या बदल्यात, मी दोन आठवड्यांसाठी इराणवरील बॉम्बहल्ले आणि हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली आहे.

रिपोर्टनुसार, इरान देखील सीजफायरसाठी तयार झाला आहे. इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी मान्य केलं आहे की, तेहरानकडून मागण्या मान्य करण्यात आल्या आहे… त्यांनी सांगितले की, इराणी सैन्याच्या समन्वयाने, दोन आठवड्यांसाठी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले दोन एलपीजी टँकर होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून भारतीय बंदरांच्या दिशेने निघाले आहेत, तर इतर 16 मालवाहू जहाजे पर्शियन आखातात अडकून पडली आहेत, असं अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितलं.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी सांगितल्यानुसार 46 हजार 650 टन एलपीजी घेऊन जाणारा ‘ग्रीन सान्वी’ हा टँकर 7 एप्रिल रोजी भारतात पोहोचेल असं सांगण्यात आलं होतं. तर 15 हजार 500 टन गॅस घेऊन जाणारा ‘ग्रीन आशा’ हा टँकर 9 एप्रिल रोजी भारतीय किनारपट्टीवर पोहोचेल.

भारताला मिळणार मोठा दिलासा…

भारत आपल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या गरजेपैकी सुमारे 60 टक्के गरज आयातीद्वारे भागवतो, त्यापैकी सुमारे 90 टक्के गॅस पश्चिम आशियातून येतो. गेल्या काही दिवसांपासून देशात LPG सिलेंडर आणि इंधनाचा तुटवडा भासत होता. पण आता दोन आठवड्यांसाठी युद्ध थांबल्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाडे सुरक्षितपणे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळणार आहे…



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठमोळ्या अभिनेत्रीचं अपहरण, 3 महिने एकाच ठिकाणी डांबून ठेवलं आणि… स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी केलेली सुखरुप सुटका
  • Weather Alert : आज रात्री येणार मोठी आफत… यावेळचं संकट मोठं, वेधशाळेचा इशारा; या राज्यांना मोठा धोका
  • कलिंगडच्या सालीपासून बनवा चविष्ट पदार्थ, साल कधीच फेकू नका…
  • Sanjay Raut : सीजफायरचं श्रेय पाकिस्तानला जाताच राऊत खूप जिव्हारी लागणारं बोलले, जयशंकर माकड, मोदी टेलिफोन ऑपरेटर
  • KKR vs PBKS: एक पॉइंट दिला..! श्रेयस अय्यरच्या बहिणीने शाहरूख खानच्या संघाची उडवली खिल्ली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in