• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भररस्त्यात सर्वांसमोर ढसाढसा रडलेला सलमान खान…, भाईजानबद्दल मोठं सत्य अखेर समोर

April 5, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता सलमान खान फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील कामय चर्चेत असतो, खुद्द सलमान खान याने देखील स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहे. एवढंच नाही तर, रिलेशनशिपबद्दल देखील अभिनेता म्हणाला आहे. सलमान खान याच्या रिलेशनशिपबद्दल तर आज प्रत्येकाला माहिती आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत, ज्यामध्ये दिग्दर्शिका आणि कोरियोग्राफर फराह खान हिने सलमान खान याच्याबद्दल मोठा खुलासा केलेला. theranveershowpodcast या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये फराह म्हणते, ‘सलमान खान कधीच स्वतःच्या मनातील दुःख कोणाला सांगत नाही. पण मनातून मेणासारखा आहे. माझं मन तेव्हा दुखावलं जेव्हा ब्रूकलिन ब्रिजवर रडलायना, तेव्हा तो खरंच रडला आहे. जर तुम्ही ते गाणं पाहिलं तर कळेल, कोणत्याच प्रकारचं ग्लिसरीन वापरण्यात आलेलं नाही. तो खरंच तेव्हा त्या पुलावर रडला आहे. ती एक जादू होती आणि त्यानंतर त्याला पाहिल्यानंतर मला देखील रडू आवरलं नाही…’, “सौ दर्द हैं, सौ राहतें” असं त्या गाण्याचं नाव आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by The Ranveer Show (@theranveershowpodcast)

 

ब्रूकलिन ब्रिजबद्दल सांगायचं झालं तर, ब्रूकलिन ब्रिज (Brooklyn Bridge) हा अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ईस्ट रिव्हरवर बांधलेला. या ब्रिजवर अनेक सिनेमांसाठी शुटिंग झालं आहे. अभिनेता सलमान खान स्टारर ‘जान-ए-मन’ (Jaan-E-Mann) सिनेमातील “सौ दर्द हैं, सौ राहतें” (Sau Dard Hai) गाणं याच ब्रिजवर शूट झालं असून, गाण्यात भाईजान ढसाढसा रडताना दिसला. सिनेमात सलमान आणि अभिनेत्री प्रिती झिंटा यांनी एकत्र स्क्रिन शेअर केलेली. गाणं आजही अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. सिनेमा 2006 मध्ये प्रदर्शित झालेला.

“सौ दर्द हैं, सौ राहतें” गाण्याबद्दल सांगायचं झालं तर, हे एक रोमँटिक गाणं असून, गाणं गायक सोनू निगम याने गायलं होतं. तर अनू मलिक यांनी संगीत दिलं होतं आणि गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले होतं… आजही हे गाणं चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे…

सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलंं. पण अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत असलेलं सलमान याचं नातं आजही चर्चेत असतं… ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमात दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरलेला, पण त्यांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : मोहरीच्या तेलाचा आणि तुरटीचा करा हा चमत्कारीक उपाय, तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही
  • इस्रायल बॅकफूटवर… नेतान्याहूंची माघार, लेबनॉनबाबत इस्रायलचा मोठा निर्णय
  • Vastu Shastra : सुख समृद्धीसाठी करा हे 7 सोपे उपाय, आयुष्यात पुन्हा कधी आर्थिक संकट येणार नाही
  • Dieting शिवाय कमरेचा घेर कसा कमी करायचा?
  • Vitamin D च्या कमतरतेने मेंदूचे वय वाढते, नव्या संशोधनात केला दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in