• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बनारस येथे वेश्याव्यवसाय करणारी प्रसिद्ध महिला, तिच्याशी संजय दत्तचे खास कनेक्शन, जाणून व्हाल अवाक्

April 10, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता संजय दत्त कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता ‘धुरंधर 2’ सिनेमामुळे चर्चेत आहे. पण संजूबाबा त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. आज संजूबाबा त्याची तिसरी पत्नी आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे… पण बनारस येथील प्रसिद्ध आणि लोकप्रिय वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेसोबत संजय दत्त याच्या असलेल्या खास कनेक्शनबद्दल फार कोणाला माहिती नाही…

सांगायचं झालं तर, इलाहबाद याठिकाणी प्रसिद्ध वेश्याव्यवसाय करणारी महिली दलीपाबाई… दलीपाबाई यांच्या घरी जन्मझाला नर्गिस यांच्या आई जद्दनबाई यांचा… जद्दनबाई देखील ठुमरी आणि सुंदर गीत गायच्या. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी लांबून लोकं यायची. जद्दनबाई यांनी दोन लग्न केली. पण त्यांची दोन्ही लग्न अपयशी ठरले.

त्यानंतर जद्दनबाई यांनी तिसरं लग्न कले आहे. अभिनेत्री नर्गिस यांना जन्म दिला. लेकीच्या जन्मनांतर देखील जद्दनबाई गाणं गायच्या… अखेर प्रसिद्धीझोतात आल्यानंतर त्यांना सिनेमात काम करण्याची देखील संधी मिळाली. सांगायचं झालं तर, जद्दनबाई, दिवंगत अभिनेत्री नर्गिस यांच्या आई होत्या. म्हणजे संजूबाबा याच्या आजी…

नर्गिस यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर नर्गिस यांनी ‘मदर इंडिया’ सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली आणि चाहत्यांच्या मनात घर केलं. त्या काळात नर्गिस प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी होत्या.

रिपोर्टनुसार, जद्दनबाई यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. कर्जाची परतफेड करण्यासाठी जद्दनबाई यांनी मुलगी नर्गिस हिला सिनेमांमध्ये काम करण्यास सांगितलं. नरगिस यांनी अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. तेव्हा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत नर्गिस अव्वल स्थानी होत्या. पण नर्गिस यांना डॉक्टर व्हायचं होतं.

पण करियर यशाच्या शिखरावर असताना नर्गिस यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला आणि सुनिल दत्त यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, काही वर्षांनंतर नर्गीस यांनी अभिनय विश्वात पुन्हा पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. पण वयाच्या 51 व्या वर्षी नर्गिस कर्करोगाच्या विळख्यात अडकल्या. कर्करोगामुळे नर्गिस यांचं निधन झालं. आईच्या निधनानंतर संजूबाबा अनेकदा आईच्या आठवणीत भावूक होतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वन्यजीव संरक्षणासाठी नवे पर्व; वनतारा सुरू करणार जागतिक विद्यापीठ, अनंत अंबानींची घोषणा
  • डेटा कॉलिंग आणि SMS, जिओचा सर्वात स्वस्त 28 दिवसांचा प्लॅन
  • IPL 2026 : फिन एलनला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यानंतर केकेआरचा संताप, पण…
  • ‘राम’नावाचा जप करतच बघावा लागेल हा प्रचंड हॉरर चित्रपट, OTT वर करतोय ट्रेंड, घाबरट लोकांनी दूरच राहावे
  • WhatsApp चे जबरदस्त फीचर; आता नंबर शेअर न करता करा चॅट, बिनधास्त मारा गप्पा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in