
आडोशी बोगद्याजवळ झालेल्या टँकर अपघातामुळे पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर बत्तीस तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती झाल्यामुळे रस्ता बंद ठेवण्यात आला होता, जो बत्तीस तासानंतर प्रशासनाकडून बाजूला करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही लोणावळ्याजवळ सुमारे वीस किलोमीटर लांब रांगा लागल्या असून वाहतूक जैसे थे आहे.
सकाळी सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत केवळ दोन किलोमीटर अंतर पार करता आले, असे प्रवाशांनी सांगितले. वाहनचालकांना वाहनांमध्येच रात्र काढावी लागली. वाहतूक पोलीस झोपलेल्या वाहनचालकांना उठवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे हा राज्यातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक असून, १९९९ नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली आहे. प्रवाशांकडून ही कोंडी लवकरात लवकर सुटावी अशी मागणी होत आहे.
Leave a Reply