• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पश्चिम बंगालच्या सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या, राष्ट्रपतींच्या अपमानावरून PM मोदींची TMC सरकारवर टीका

March 7, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम बंगालमधून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर नाराजी व्यक्त केली. सिलीगुडीतील बागडोग्रा येथील गोसाईपूर येथे आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेच्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सिलीगुडी उपविभागातील विधाननगर भागात पोहोचल्या. याठिकाणी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला आयोजकांनी विधाननगरमध्ये परिषद आयोजित करण्याची घोषणा केली होती, परंतु त्यानंतर चार वेळा स्थळ बदलण्यात आले. यावरून राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाष्य केले आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी

गोसाईपूर येथे आंतरराष्ट्रीय संथाल परिषद पार पडली. याआधी ही परिषद विधाननगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने बागडोगरा विमानतळाजवळील गोंसाईपूरमध्ये बैठक आयोजित करण्याची परवानगी दिली होती. यानंतर राष्ट्रपती विधाननगर मध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, ‘प्रशासनाच्या मनात काय होते हे मला माहित नाही; त्यांनी मला येथे आणले नाही. मी त्यांना सांगितले की मला कोणतीही समस्या दिसत नाही. मी बंगालची मुलगी आहे, तरीही मला इथे येऊ दिले जात नाही. ममता माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे; मला माहित नाही, कदाचित ती माझ्यावर रागावली असेल.’

This is shameful and unprecedented. Everyone who believes in democracy and the empowerment of tribal communities is disheartened.

The pain and anguish expressed by Rashtrapati Ji, who herself hails from a tribal community, has caused immense sadness in the minds of the people… https://t.co/XGzwMCMFrT

— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2026

PM मोदींची बंगाल सरकारवर टीका

बंगाल सरकारच्या परिषदेचे ठिकाण बदलण्याच्या निर्णयावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, हे लज्जास्पद आणि अभूतपूर्व आहे. लोकशाही आणि आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणावर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण निराश झाला आहे. आदिवासी समुदायातील राष्ट्रपती यांनी व्यक्त केलेल्या वेदना आणि व्यथा यामुळे नागरिकांच्या मनात प्रचंड दुःख निर्माण झाले आहे.

पश्चिम बंगालच्या तृणमूल सरकारने खरोखरच सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. राष्ट्रपतींच्या या अपमानासाठी त्यांचे प्रशासन जबाबदार आहे. पश्चिम बंगाल सरकारकडून संथाल संस्कृतीसारख्या महत्त्वाच्या विषयाला इतके दुर्लक्षितपणे वागवले जाणे तितकेच दुर्दैवी आहे. राष्ट्रपतींचे पद राजकारणाच्या वर आहे आणि या पदाच्या पावित्र्याचा नेहमीच आदर केला पाहिजे. पश्चिम बंगाल सरकार आणि तृणमूल काँग्रेसमध्ये चांगली समजूतदारपणा निर्माण होईल अशी आशा आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in