• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नव्या पंतप्रधानाच्या शपथविधीपूर्वीच बांगलादेशमधून भारतासाठी आली सर्वात मोठी गुडन्यूज, पाकिस्तान, चीनचा नुसता जळफळाट

February 16, 2026 by admin Leave a Comment


बांगलादेशमध्ये नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP ने दणदणीत यश मिळवलं. आता लवकरच बांगलादेशमध्ये बीएनपी सरकार स्थापन करणार आहे. तारिक रहमान हे मंगळवारी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा सुरू असून, या शपथविधी सोहळ्यासाठी भारतासह जागातील प्रमुख देशांना निमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर बांगलादेशचे भारतासोबत संबंध कसे असतील? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांचं सरकार कोसळलं, तेव्हापासून भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. सरकार कोसळल्यानंतर शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या आहेत, शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला आहे. त्यावरून बांगलादेशमधील काळजीवाहू सरकार आणि भारतामधील संबंध चांगलेच ताणले गेल्याचं पहायला मिळालं, मात्र आता बांगलादेशमध्ये नवीन सरकार आलं आहे. तारिक रहमान हे मंगळवारी पंतप्रधानपदाची थपथ घेणार आहेत. दरम्यान शेख हसीना यांच्या मुद्द्यावर बांगलादेशच्या नव्या सरकारची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली असतानाच आता बांगलादेशमधून अधिकृत स्टेटमेंट आलं आहे.

यावर बोलताना बीएनपीचे महासचिव मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी मोठं विधान केलं आहे. शेख हसीना या भारतामध्ये आहेत, मात्र त्यामुळे भारत आणि बांगलादेशमधील संबंधांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. भारत आणि बांग्लादेशमधील संबंध आणखी मजबूत होतील, असं त्यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही हे मान्य करतो की शेख हसीना यांनी मानवाधिकाराच गंभीर उल्लंघन केलं आहे. त्यांना शिक्षा व्हावी अशी येथील नागरिकांची इच्छा आहे. मात्र सध्या शेख हसीना या भारतामध्ये आहेत, आणि त्यांची भारतामध्ये असलेली उपस्थितीचा भारत बांगलादेश संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. भारतानं शेख हसीना यांचं प्रत्यार्पण केलं नाही तरी देखील भारत आणि बांगलादेशमधील व्यापारी संबंध हे मजबूत राहातील असं मिर्झा फखरुल इस्लाम यांनी म्हटलं आहे. दरम्यान बीएनपीकडून आलेली ही प्रतिक्रिया पाकिस्तान आणि चीनसाठी मोठा झटका मानली जात आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in