
काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी संसदेतील कामकाजातील पक्षपातावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. निशिकांत दुबे यांना संसदेत पूर्ण वेळ बोलण्याची संधी मिळत असताना, राहुल गांधी देशाच्या सुरक्षेवर किंवा चीनच्या घुसखोरीवर बोलू लागताच त्यांचा माईक बंद केला जातो किंवा त्यांना अडथळा निर्माण केला जातो, असे त्यांनी म्हटले. निष्पक्षतेची अपेक्षा असतानाही तसे घडले नाही, असे गायकवाड यांनी नमूद केले.
गायकवाड यांनी निशिकांत दुबे यांच्या महिलांबद्दलच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांचा मुद्दा उपस्थित केला. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून त्यांनी दुबे यांच्या मनात किती विष आहे, असा प्रश्न विचारला. पंतप्रधान आणि अमित शहा यांचा अशा वक्तव्यांना पाठिंबा आहे का, अशी थेट विचारणा त्यांनी केली. संसदीय लोकशाहीवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या शिकवणीनुसार शांतता व अहिंसेवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून आपण बॅनर घेऊन शांततेने आंदोलन केले, असे त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply