
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर, संजय शिरसाट यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. त्यांनी संजय राऊत यांना तिळगुळ देऊन गोड बोलण्याचा सल्ला दिला. संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांच्यातील माणुसकी आणि निष्ठेचे त्यांनी कौतुक केले.
इम्तियाज जलील यांच्या पतंग उत्सवावर बोलताना शिरसाट म्हणाले की, जलील यांचा हा शेवटचा पतंग असेल आणि त्याची दोर आपल्या हातात आहे. १६ तारखेला निकाल स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर सत्ताधाऱ्यांना प्रचारसाठी वेळ दिल्याचा आरोप केला होता, तो शिरसाट यांनी फेटाळला. प्रचार संपल्यानंतरही घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधणे ही नेहमीची प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पैशांचे वाटप करून निवडणुका जिंकता येतात, या राऊतांच्या आरोपाला शिरसाट यांनी मतदारांचा अपमान ठरवले. लोकशाही पैशावर नव्हे, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चालते, असे त्यांनी नमूद केले. संजय राऊत यांनी इतरांवर टीका करण्याऐवजी स्वतःच्या पक्षाच्या स्थितीकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही शिरसाट यांनी दिला.
Leave a Reply