• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले

March 5, 2026 by admin Leave a Comment


आखाती देशांवरील हल्ल्यांमुळे सागरी व्यापार मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम भारताच्या निर्यात व्यापारावर होत आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (JNPA) बंदरात भारतीय उत्पादनांचे हजारो कंटेनर अडकून पडले आहेत.

यामध्ये जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील केळीचे सुमारे १२०० कंटेनर, तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षांचे १ हजार कंटेनर यांचा समावेश आहे. यामुळे द्राक्षांच्या साठवणुकीचा आणि निर्यातीचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताचा जवळपास २ लाख टन बासमती तांदूळही विविध बंदरांवर अडकला आहे, ज्यापैकी ८० टक्के निर्यात आखाती देशांना होते. युद्धाच्या परिस्थितीमुळे काही शिपिंग कंपन्यांनी माल पाठवण्यास नकार दिला आहे, तर काहींनी आपत्कालीन अधिभार लावला आहे, ज्यामुळे आयात-निर्यात महाग झाली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in