• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जाळा फक्त ही एक छोटीशी वस्तू, पुन्हा वर्षभर घरात येणार नाही साप, गावात कोणाकडेही सहज मिळेल

February 19, 2026 by admin Leave a Comment


भारतामध्ये विविध प्रजातींचे साप आढळतात, त्यामध्ये काही हे विषारी असतात, तर काही निमविषारी तर काही हे बिनविषारी असतात. मात्र अनेक प्रजातीच्या सांपामध्ये बऱ्यापैकी साम्य दिसत असल्यानं कोणता साप हा विषारी आहे? आणि कोणता साप बिनविषारी आहे? हे ओळखण्यात आपण मोठी चूक करतो, अशा परिस्थितीमध्ये विषारी सापांचा दंश झाला तर त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो, जर उदाहरण द्यायचं झालं तर अजगर आणि घोणस या दोन सांपामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. अजगर हा बिनविषारी साप असतो, तर घोणास हा अत्यंत विषारी साप असतो, अनेकजण अजगर समजून घोणसला पकडतात, मात्र हा साप अत्यंत विषारी असल्यामुळे त्याचा दंश हा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे कोणताही साप घरात किंवा इतर कुठेही निघाला तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका, साप कोणताही असो, विषारी, बिनविषारी त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते या सापांना पकडून त्याच्या सुरक्षित अधिवासात सोडतील.

अनेकदा पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे आणि उन्हाळ्यात जमीन तापल्यामुळे साप सुरक्षित अधिवास शोधत असतात. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहे, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप हे नेहमी थंड जागेच्या शोधात असतात. अशा स्थितीमध्ये जर आपल्या घरात काही अडचण असेल, किंवा जिथे दाट झाडी झुडपं असतील अशा ठिकाणी साप गारव्याला येऊ बसतात, अशावेळी सर्पदंशाच्या घटना देखील वाढतात. साप घरात येऊ नये, यासाठी अनेक उपाय योजना आहेत, त्यामध्ये घर नेहमी स्वच्छ ठेवणे, घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, गवत न वाढू देणे या काही गोष्टी सांगता येतील.

मात्र याही पलीकडे जाऊन सापांसाठी ग्रामीण भगांमध्ये एक उपाय केला जातो, तो म्हणजे जर घरात साप निघाला असेल तर जनावरांचं शिंग जाळलं जातं. जनावराच्या शिंगाला तीव्र असा वास असतो, ज्यामुळे साप घरात थांबत नाही, असं मानलं जातं. यासाठी आजही ग्रामीण भागातील लोक जर एखादं जनावर मृत झालं असेल तर त्याचे शिंग जपून ठेवतात, जर एखाद्या घरात साप शिरला असेल आणि तो दिसत नसेल तर अशा स्थितीमध्ये जनावराचं शिंग जाळलं तर त्याच्या वासामुळे साप घरातून बाहेर पडतो, आणि पुन्हा त्या परिसरात येत नाही असं मानलं जातं. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी, साप कुठेही निघाला तरी तो स्वत: पकडण्याचा प्रयत्न करू नये, त्याची माहिती लगेच सर्पमित्रांना द्यावी, तसेच जर समजा चुकून सर्पदंश झाला तर साप कोणताही असो, विषारी, बिनविषारी तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका
  • RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका
  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in