• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चीन की पाकिस्तान, भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? C-Voter सर्वेक्षणात जनतेनेच सांगितलं खरा धोका कोणापासून?

April 9, 2026 by admin Leave a Comment


C-Voter Survey : सध्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा भारतावर काय परिणाम पडणार? भारतासाठी चीन धोकादायक आहे की पाकिस्तान? युद्धाच्या काळात भारताचे परराष्ट्र धोरण कसे आहे? असे अनेक प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. याच सर्व प्रश्नांची उत्तरं शोदणायसाठी सी-व्होटरने मार्च महिन्यात एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात देशातील प्रत्येक राज्य, प्रत्येक जिल्ह्यातील लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक आठवड्यात लोकांनी या प्रश्नांची उत्तरं वेगवेगळी दिली आहेत.

भारताने सर्वाधिक विश्वास कोणत्या देशावर ठेवायला हवा?

या सर्वेक्षणात लोकांना भारताने कोणत्या देशावर सर्वाधिक विश्वास ठेवायला हवा, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर लोकांना वेगवेगळे दिले आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साधारण 67 टक्के लोकांनी भारताने रशियावर विश्वास ठेवायला हवा, असे मत व्यक्त केले. तिसऱ्या आठवड्यात 73 टक्के तर चौथ्या आठवड्यात 70 टक्के लोकांनी रशियावर विश्वास ठेवायला हवा, असे मत व्यक्त केले. तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात क्रमश: 10, 11 आणि 14 टक्के लोकांनी अमेरिकेवर विश्वास ठेवायला हवा असे मत व्यक्त केले. दुसऱ्या आठवड्यात 23 टक्के, तिसऱ्या आठवड्यात 16 टक्के आणि चौथ्या आठवड्यातही 16 टक्के लोकांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.

भारताला सर्वात मोठा धोका कोणाचा?

मार्च महिन्यात दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात भारताला सर्वाधिक धोका कोणत्या देशाचा आहे, असेही विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना दुसऱ्या आठड्यात 41 टक्के, तिसऱ्या आठवड्यात 44 टक्के तसेच चौथ्या आठवड्यात 44 टक्के लोकांना चीन भारतासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे वाटले. पाकिस्तान भारतासाठी धोका आहे, असे सांगणाऱ्या नागरिकांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात क्रमश: 30, 31, 34 टक्के आहे.

देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत समाधानी आहात का?

या सर्वेक्षणात लोकांना तुम्ही देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत संतुष्ट आहात का, असे विचारण्यात आले. याचे उत्तर देताना आम्ही समाधानी आहोत असे सांगणाऱ्यांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात क्रमश: 27, 33, 32 टक्के आहे. काही प्रमाणात समाधानी असणाऱ्यांचे प्रमाण हे दुसऱ्या आठवड्यात 24 टक्के, तिसऱ्या आठवड्यात 22 टक्के आणि चौथ्या आठवड्यात 21 टक्के आहे. काही प्रमाणात समाधानी नसणाऱ्यांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात अनुक्रमे, 25, 20, 22 टक्के आहे. देशाच्या परराष्ट्र धोरणाशी असहमत नसणाऱ्यांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात अनुक्रमे 18, 20, 20 टक्के आहे.

युद्धाचा भारतातील कोणत्या क्षेत्रावर परिणाम पडेल?

या प्रश्नाचे उत्तर देताना देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम पडण्याची शक्यता व्यक्त करणाऱ्यांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात अनुक्रमे 45, 50, 47 टक्के आहे. परराष्ट्र धोरणावर परिणाम होईल असे सांगणाऱ्यांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात अनुक्रमे 16, 13, 16 टक्के आहे. राजकारणावर परिणाम होईल असे मत मांडणाऱ्यांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात अनुक्रमे 11, 13,13 टक्के आहे. काहीही सांगता न येणाऱ्यांचे प्रमाण दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात 18, 16, 15 टक्के आहे. अन्य क्षेत्रात परिणाम पडणार आहे, असे सांगणाऱ्यांचे मत दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात अनुक्रमे 10, 8, 9 टक्के आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आधी 167 कोटींच्या पेंटिंगने चर्चा, पुनावाला यांच्या सुनेकडे आहे तब्बल 126 कोटींची गुलाबी हिऱ्याची अंगठी
  • samudrik shashtra : तुमच्या केसांच्या रंगावरून तुमचे व्यक्तीमत्व कसे कळते?
  • Hingoli | बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
  • Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी Team India मध्ये? केव्हा लॉटरी लागणार, कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? काय मोठी अपडेट?
  • Jay Pawar | बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in