
मेघालयाल पूर्वीतील जैतिया हिल्स जिल्ह्यात गुरुवारी एका कोळसा खाणीत मोठा अपघात झाला आहे. या कोळसा खाणी मोठा स्फोट झाल्याने १६ मजूर गाडले जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन, पोलिस, SDRF ची पथके घटनास्थळी पोहचून रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. ताशखाईच्या या कोळसा खाणीत जेव्हा स्फोट झाला तेव्हा खाणीत अनेक मजूर काम करत होते ते लोक या स्फोटाच्या तावडीत सापडले. आतापर्यंत १६ मजूरांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. खाणीत अनेकजण ढीगाऱ्याखाली दबले असल्याचे म्हटले जात आहे. हे मजूर आसाम येथील राहणारे असल्याचे म्हटले जात आहे.
DGP नोंगरंग यांनी दिली माहिती
ताशखाई येथील कोळसा खान पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. कोयला खाणीत स्फोट झाल्यानंतर गुरुवारी १६ मजूरांचा मृत्यू झाला. मेघालयाचे डीजीपी आई नोंगरंग यांनी सांगितले की ही घटना थांगस्कू विभागात घडली. घटनास्थळावर रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले आहे. स्थानिक पोलिस-प्रशासन आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाला आहे.
डीजीपी काय म्हणाले ?
घटनास्थळावरुन आतापर्यंत आम्ही १६ मृतदेहांना बाहेर काढले आहे. परंतू बॉम्बस्फोटानंतर खाणीत काम करीत असलेल्या लोकांच्या संख्ये बाबत योग्य माहिती मिळालेली नाहीय.त्यामुळे ढीगाऱ्यातच अनेक लोक अडकून पडल्याचा संशय आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की स्फोटाच्या कारणांचा अजून पत्ता लागलेला नाही.
‘रॅट-होल’ मायनिंगवर बंदी असूनही….
या अपघाताचा प्रथमदर्शनी अहवाल आला असून ही खाण ‘रॅट-होल’ खाण प्रकारातील असून ती अनधिकृतरित्या सुरु असल्याचे माहीती उघडकीस आली आहे. NGT ने 2014 साली मेघालयात ‘रॅट-होल’ मायनिंगवर कायद्याने बंदी घातलेली आहे. या खाणींमुळे पर्यावरणाचे नुकसान होतेच शिवाय मजूरांच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण होतो अशी माहिती उघडकीस आली आहे. ‘रॅट-होल’ खाण प्रकारात अरुंद बोगदे खणले जातात, ते तीन ते चार फुट उंचीचे असतात. त्यात मजूरांना उंदरासारखे आत शिरुन कोळसा काढावा लागतो. सुप्रीम कोर्टाने होल मायनिंगवर बंदीला योग्य ठरवले होते.
पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त केले, मदतनिधी जाहीर केला
या घटनेच मृत झालेल्या मजूरांच्या कुटुबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. मृतांच्या वारसदारांना तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधान राष्ट्रीय रिलीफ फंडातून जाहीर केल्याचेही मोदी यांनी म्हटले आहे.
Leave a Reply