• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

किडनीचा प्रत्येक आजार होईल बरा, बाबा रामदेव यांनी सांगितले हे प्रभावी घरगुती उपाय

February 7, 2026 by admin Leave a Comment


आजकाल किडनीमध्ये स्टोन होणे, किडनीला सूज येणे आणि किडनी डॅमेज होणे अशा समस्या सामान्य झाल्या आहेत. तर या समस्या उद्भवण्याचे कारण म्हणजे पाण्याचा अभाव, अस्वस्थ खाण्याच्या सवयी आणि जास्त लोहाचे प्रमाण या सर्वांमुळे किडनीच्या समस्या वाढू लागलेल्या आहेत. जर किडनीच्या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्या गंभीर आजारात बदलू शकतात. किडनीच्या या समस्या दूर करण्यासाठी अनेक उपचार आणि औषधे बाजारात उपलब्ध असली तरी तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने त्यावर उपचार करू शकता. ही आयुर्वेदिक पद्धत अत्यंत प्रभावी आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम तुमच्या शरीराला होत नाहीत.

आयुर्वेद तज्ञ बाबा रामदेव हे नेहमी सोशल मीडियाद्वारे लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांवर उपाय सांगत असतात. यावेळी बाबा रामदेव यांनी किडनीच्या आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी एक प्रभावी घरगूती उपाय सांगितला आहे, जे किडनीचे आरोग्य सुधारेल आणि आजार देखील बरे करेल. तर आजच्या लेखात आपण या घरगुती उपायाबद्दल जाणून घेऊयात.

बाबा रामदेव यांनी सांगितलेले घरगुती उपाय

बाबा रामदेव यांनी किडनी स्टोन आणि सुज यावर विविध घरगुती उपाय सुचवले आहेत, जे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय तुमच्या शरीरासाठी प्रभावी ठरतील. यामध्ये कडुनिंब, पिंपळाच्या पानांचा रस, कसनी (आयुर्वेदिक औषधी वनस्पती), सराटा (गोखरू,आयुर्वेदिक औषधी वनस्पती ) कोथिंबीर आणि पुदिना यासारख्या औषधी वनस्पतींचा रस बनवून प्यायल्याने किडनीचे आजार बरे होतात.

तर बाबा रामदेव यांच्या मते, जी लोक दररोज आहारात कोथिंबीर समावेश असतो त्यांची किडनी निरोगी राहते. खरं तर कोथिंबीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे अ, क, के आणि खनिजे किडनी निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते, ज्यामुळे किडनी योग्यरित्या कार्य करू शकते.

किडनी स्टोन रोखण्यासाठी प्रभावी मार्ग

एखाद्याला जर स्टोनची समस्या असेल तर ते काढून टाकण्यासाठी तुम्ही दररोज कुळीथाच्या डाळीचे सेवन करावे. कारण या डाळीत असलेले काही संयुगे किडनी स्टोन‍ विरघळवातात.

मधुमेही रूग्णांना किडनीची समस्या सतावत असेल तर हा रस प्यावा

बाबा रामदेव हे मधुमेही लोकांना कारल्याचा रस पिण्याचा सल्ला देतात. कारण कारल्याचा रस प्यायल्याने पोट प्रभावीपणे साफ होते. शिवाय, मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर मानले जाते. जर कारल्याचा रस प्यायल जात नाही तेव्हा त्यात टोमॅटो प्यूरी मिक्स करून प्यावे. रामदेव यांच्या मते, आठवड्यातून एकदा तरी कारल्याचा रस प्यायल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अश्लील व्हिडिओ पाहण्यात गुंग, अचानक समोर स्वत:चाच व्हिडिओ, गर्लफ्रेंडसोबत… तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली!
  • T20 World Cup 2026 Opening Ceremony Live: भारत-यूएसए सामन्याआधी रंगारंग कार्यक्रम, नोराच्या दिलखेचक अदांसाठी चाहते उत्सूक
  • शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता जाणवल्यास ‘या’ शाकाहारी पदार्थांचे करा सेवन
  • भावाने विष दिलं अन् किडणी निकामी झाली! प्रसिद्ध अभिनेत्याची गंभीर अवस्था
  • कोरियन ग्लो मिळवण्यासाठी नेमकं काय करावे?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in