• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काय? भारताच्या आकाशातील तारे का होतायेत गायब? शास्त्रज्ञांनी सांगितले ते धक्कादायक कारण

April 5, 2026 by admin Leave a Comment


Star Disappearing form Sky: गेल्या काही दिवसांपासून काही खगोलीय घटनांमुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. त्यांनी भारताच्या आकाशातील ताऱ्यांचं निरिक्षण केलं आहे. आकाशातील तारे कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आकाशातील कोणता राक्षस या ताऱ्यांना गिळत आहे, याची चर्चा होत आहे. शास्त्रज्ञांनी या घटनेविषयी धक्कादायक कारणं पुढे केली आहेत. काय आहे खगोलशास्त्रज्ञातील ही वेगळी अपडेट?

तारे का होतायेत गायब?

पूर्वी गावात अथवा छोट्या शहरात रात्रीच्या वेळी आकाश अगदी निरभ्र, स्वच्छ आणि ताऱ्यांनी झाकोळलेले दिसायचे. असंख्य तारे लुकलुकत असलेले दिसायची. आता शहरातील तीव्र प्रकाश आणि प्रदूषणामुळे आकाश तितके स्वच्छ उरलेले नाही. आकाश अस्पष्ट आणि अंधुक दिसते. दिल्ली, मुंबई सारख्या बड्या शहरातील स्थिती तर यापेक्षा अधिक वाईट आहे. आता आंधारून आल्यानंतरही पूर्वी इतकी तारी आकाशात हुडकल्यावरही नजरेस पडत नाही. लहान मुलांना तर आकाशातील लुकलुकणाऱ्या ताऱ्यांचे आकर्षण कमीच झाले आहेत.

लद्दाख येथील हॅनले आणि महाराष्ट्रातील पेंच येथील अत्यंत डार्क स्काई रिझर्व्ह भागातून आकाश निरभ्र, स्वच्छ दिसतं. कारण इथं काळोख पसरलेला असतो. इथून आकाशगंगा अगदी स्पष्ट दिसते. तिचा मनमोहकपणा मनाला तजेला देतो. आकर्षित करतो. काही दिवसांपूर्वी देशातील अनेक भागातून अशीच स्पष्ट आकाशगंगा दिसत होती. अनेक तारे न्याहळता येत होते. आकाश इतके चमकदार होते की त्याचे प्रतिबिंब नदी, धरणं, तलावाच्या पाण्यात जणू परावर्तीत होण्याचा भास होत होता.

या कारणांनी तारे गायब

तारे गायब होण्यामागील सर्वात मोठे कारण कृत्रिम प्रकाश हे आहे. लाईट, स्ट्रीट लाईट यामुळे आकाशातील ताऱ्यांचा प्रकाशा झोकाळून जातो. या प्रकाशामुळे आकाश अंधुक होते. हवेतील धूळ, प्रदूषण यामुळे तर आकाशातील सौंदर्य पृथ्वीवरील माणूस हरवत चालला आहे. चंद्र आणि चांदण्यांना धरून अनेक गीतं आणि गजलांनी आपल्या मनाची तृप्ती होते. पण ज्यावर हे काव्य तयार झाले, तेच आता आपल्यातून हरवत चालल्याचे समोर येत आहे. केवळ मानवालाच नाही तर पशू पक्षी, प्राणी यांनाही या मानवी हस्तक्षेपाचा त्रास होत आहे. अनेक भागात रात्रीच्या वेळी या ताऱ्याच्या प्रकाशात विहार करणाऱ्या प्राण्यांना भ्रमंतीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही फुलं ही रात्रीच्या वेळी उमलतात. त्यावर परिणाम होत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्हालाही ऑफीसच्या डेस्कवरच जेवणाची सवय आहे? मग आजच व्हा सावध, वास्तुशास्त्र काय सांगतं?
  • Chanakya Niti : नोकरीत यश मिळवायचं आहे? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवाच
  • vastu tips : घरात पैसा टिकत नाही? मग आजच घरी आणा या वस्तू
  • Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले…
  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in