• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कायमच विचित्र मत मांडणारे राम गोपाल वर्मा हे ए. आर. रहमान यांच्या वादात मात्र पटेल असं बोलले

January 25, 2026 by admin Leave a Comment


‘ऑस्कर’, ‘गोल्डन ग्लोब’ यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार पटकावणारे संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान हे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल जे वक्तव्य केलं, त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. रहमान यांनी या मुलाखतीत विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाला फूट पाडणारा असं म्हटलं होतं. त्याचसोबत बॉलिवूडमधील पॉवर शिफ्ट, सांप्रदायिकता यांवरही त्यांनी टिप्पणी केली. गेल्या आठ वर्षांत मला बॉलिवूडमध्ये काम मिळालं नसल्याचा खुलासा रहमान यांनी या मुलाखतीत केला होता. यासाठी त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सांप्रदायिक भेदभावाला कारणीभूत ठरवलं होतं.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राम गोपाल वर्मा म्हणाले, “मी त्यांच्या सांप्रदायिकवाल्या गोष्टीवर कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. कारण मला त्यात काही सत्य आढळलं नाही. मला तर असं वाटतं की फिल्म इंडस्ट्रीत फक्त पैसे कमावण्याविषयी बोललं जातं. जो कोणी त्यांना पैसा मिळवून देतो, ते त्यांच्याच मागे लागतात. जात, धर्म किंवा तुम्ही कुठून आहात, या सर्व गोष्टींनी काही फरक पडत नाही. जर दाक्षिणात्य दिग्दर्शिक चित्रपट ब्लॉकबस्टर बनवत आहेत, तर लोक त्यांच्याकडे जातील.” यावेळी त्यांनी गायक एसपी बालसुब्रहमण्यम यांचं उदाहरण दिलं, ज्यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख बनवली होती.

“जेव्हा दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी एसपी बालसुब्रहमण्यम यांना ‘मैंने प्यार किया’ आणि ‘हम आपके है कौन’साठी साइन केलं होतं, तेव्हा त्या चित्रपटातील गाणी जबरदस्त हिट झाली होती. यामुळेच त्यांनी त्यांची निवड केली होती. त्यांच्यानंतर इतर गाणी फारशी चालली नाहीत. गायक हिंदीतला असो, तेलुगू भाषेतला असो किंवा तमिळचा असो.. याने काहीच फरक पडत नाही”, असं मत राम गोपाल वर्मा यांनी मांडलं. रहमान यांनी ते वक्तव्य कदाचित वैयक्तिक अनुभवांमधून केलं असावं, असंही ते पुढे म्हणाले.

“तरीही मी रहमान यांच्या वतीने बोलू शकत नाही, कारण त्यांच्यासोबत काय घडलं हे मला माहीत नाही. आपल्यापैकी कोणीही सामान्य गोष्टींबद्दलच बोलू शकतं. परंतु एखाद्याने अशी विशिष्ट घटना अनुभवली असेल, ज्यामुळे ते असं बोलत असतील. त्यांच्यासोबत खरोखर असं काही घडलं आहे का, हे मला माहीत नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकत नाही”, असं वर्मा यांनी स्पष्ट केलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरातील तुळस अचानक वाळली तर ते शुभ की अशुभ? काय आहेत समज, गैरसमज?
  • WPL 2026 Final, RCB vs DC : दिल्ली-बंगळुरु फायनलसाठी सज्ज, महाअंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
  • WPL 2026 Final : कॅप्टन जेमिमाह इतिहास बदलण्यासाठी सज्ज, दिल्ली चौथ्या प्रयत्नात चॅम्पियन होणार?
  • यंदाचे पहिले सूर्यग्रहण फाल्गुन अमावस्येला, भारतात दिसणार की नाही? वाचा…
  • Chanakya Niti : या ठिकाणी आयुष्यात कधीच जाऊ नका, उद्ध्वस्त व्हाल, चाणक्य काय म्हणतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in