
मुंबईतील हॉटेल व्यवसायाला सध्या एलपीजी गॅसच्या गंभीर टंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे मुंबईतील अनेक हॉटेल्स येत्या दोन दिवसांत बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘आहार’ या हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेचे सरचिटणीस सुनील शेट्टी यांनी सांगितले की, गेल्या गुरुवारपासून गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे, तर शनिवारपासून तो पूर्णपणे थांबला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि युद्धासारख्या परिस्थितीमुळे हा तुटवडा निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या गंभीर स्थितीवर तोडगा काढण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्याच्या आढाव्यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत केली आहे. तसेच, तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजीचे उत्पादन वाढवून ते घरगुती वापरासाठी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, अद्याप तरी हॉटेल व्यावसायिकांना या समितीकडून ठोस दिलासा मिळालेला नाही. हॉटेल बंद पडल्यास केवळ व्यावसायिकांचेच नव्हे, तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांचे आणि सामान्य मुंबईकरांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती सुनील शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
Leave a Reply