
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी सोनाली कुलकर्णी ही केवळ उत्कृष्ट अभिनेत्रीच नाही तर एक संवेदनशील लेखिका म्हणूनही ओळखली जाते. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा हा वेगळा पैलू तिच्या ‘So Kul’ या पुस्तकातून समोर आला आहे.
‘So Kul’ या पुस्तकात सोनालीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अनुभव प्रामाणिकपणे मांडले आहेत. एक अभिनेत्री म्हणून नाही तर एक सामान्य माणूस म्हणून तिचं विचारविश्व आणि जीवनप्रवास यातून वाचकांना जवळून पाहायला मिळतो. त्यामुळे हे पुस्तक वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलं.
अलीकडेच The Kanchan Adhikari Show मध्ये दिलेल्या मुलाखतीत सोनालीने आर्थिक शिस्तीबाबत आपले विचार मांडले. ती म्हणाली की, मला माझी आर्थिक घडी नीट ठेवायला आवडते. बँक, टॅक्स, टीडीएस यांसारखी सगळी कामं मी स्वतः करते. माझे फायनान्स मी स्वतः मॅनेज करते.
कलाकारांसाठी आर्थिक साक्षरता खूप महत्त्वाची आहे आणि यासाठी वर्कशॉप्स घेण्याची तिची इच्छा आहे. सोनालीने आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दलही मनमोकळेपणाने भाष्य केले. 'मी आयुष्यात मोठी किंमत मोजली आहे. चुकीची माणसं आयुष्यात आल्यावर किती नुकसान होऊ शकतं, हे मी अनुभवलं आहे. फायनान्सचं ज्ञान नसल्यामुळे माझे खूप पैसे वाया गेले असं ती म्हणाली.
मात्र, अनुभवातून शिकत तिने नंतर आर्थिक बाबींमध्ये सजगता आणली आणि पैशांची योग्य काळजी घेण्यास सुरुवात केली. सोनालीने सांगितले की, मला माझ्या जवळच्या माणसांवर आणि कलाकारांवर पैसे खर्च करायला आवडतं. पण त्यासाठी पैसे कमावणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मेहनत करण्याची आणि पैशांची योग्य काळजी घेण्याची माझी पूर्ण तयारी आहे.




Leave a Reply