
आयसीसी वनडे वर्ल्ड कप चॅम्पियन वूमन्स टीम इंडियाने विशाखापट्टणममध्ये श्रीलंकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने पहिल्या टी 20i सामन्यात एकतर्फी आणि धमाकेदार असा विजय मिळवला आहे. श्रीलंकेने टीम इंडियासमोर 122 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 14.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. भारताच्या या विजयात जेमीमाह रॉड्रिग्स हीने बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं. तर उपकर्णधार स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनीही योगदान दिलं. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
Leave a Reply