• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Uddhav Thackeray : मुंबईत प्रदूषण का वाढलं? इथली हवा आरोग्यासाठी का घातक? उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्यामागचं कारण

November 28, 2025 by admin Leave a Comment


“राज्यात सध्या सुरु असलेल्या नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीत पैशांचा धूर निघतोय. सामनाचा अग्रेलख तुम्ही वाचला असेल. पैशांचा पाऊस, अतिवृष्टी भयानक पद्धतीने महाराष्ट्रात सुरु आहे. सत्तेचा माज, या सर्व राजकर्त्यांच्या वक्तव्यातून, वागणुकीतून पाहतोय. आठ-दहा दिवसांपूर्वी मी शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो होतो. त्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसला नाहीत. जिथे जातात, तिथे पैशांच्या थैल्या उघडतात, मत मागितली जातात हे चित्र भयानक आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मुंबईत मागच्या दोन ते तीन वर्षात प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर्षी सुद्धा अनुभव घेत आहोत. मुंबईची हवा आरोग्यासाठी घातक होत चालली आहे. इथियोपियामध्ये जो ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्याचे ढग इथे आले की काय असं वाटेल. पण इथोयोपियाच्या ज्वालामुखीचा आणि मुंबईच्या प्रदूषणाचा काही संबंध नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “हा इथल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीची उद्रेक आहे. या भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग मुंबई आणि महाराष्ट्रवर रोरावत आहेत” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मुंबईत प्रदूषण का वाढलं?

“मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा आरेमधल्या कारशेडला तात्काळ स्थगिती दिली. माझा मेट्रोला विरोध नव्हता. कांजूरमार्गची जागा या सरकारने घेतली आहे. आरेमध्ये जी झाडं कापली त्यामुळे प्रदूषण वाढलय. नियोजन शून्य विकासामुळे प्रदूषण वाढलय” असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. “आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या विकासाचा प्लान आहे. हे एकमेव शहरात असलेलं जंगलं आहे. या जंगलात झाडचं नाही, तर बिबट्यापासून प्राण्यांच्या पिढ्या वर्षानुवर्षापासून इथे राहतायत. आता या उद्यानाच्या विकासाचा प्लान आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

या कोड्याचं उत्तर कुंभमेळ्याच्या खर्चात आहे का?

“जे मुंबईत चालू आहे तेच नाशिकमध्ये चालू आहे. नाशिकमध्ये पुढच्यावर्षी कुंभमेळा होत आहे. हजारो, लाखो साधूसंत, भाविक तिथे येणार. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सुविधा पुरवण्याचं काम सरकारचं आहे. प्रयागराज कुंभमेळ्याच्यावेळी तिथे चेंगराचेंगरी झाली. किती भाविकांना प्राण गमवावे लागले, त्याचा आकडा समोर आलेला नाही. भाविकांची, साधू संतांची गैरसोय होता कामा नये हे काम शासनाचं आहे. आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला जात नाही. या कोड्याचं उत्तर कुंभमेळ्याच्या खर्चात आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Uddhav Thackeray : ठाकरेंनी घेतली नार्वेकर अन् राम शिंदेंची भेट, विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीवरून काय ठरलं? 2 दिवसांत…
  • Sanjay Raut: उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेयत…संजय राऊतांचा गर्भित इशारा कुणाला? महाविकास आघाडीला ‘मनसे’ भगदाड पडणार?
  • नागार्जुनच्या दुसऱ्या पत्नीमुळे मोडला असता रजनीकांत यांचा संसार, अमालाच्या प्रेमात थलायवाने उचलेलं मोठं पाऊल
  • Anmol Bishnoi : गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून पकडून भारतात आणलं, पण…केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याच्याबाबतीत घेतला एक मोठा निर्णय
  • कोणत्या लोकांची उंची अचानक कमी होते? ‘ही’ समस्या उद्भवू शकते? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in