
नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीवरून तीव्र नाराजी समोर आल्यानंतर सरकारने डॅमेज कंट्रोल मोहीम सुरू केली आहे. कुंभमेळा 2026 च्या तयारीसाठी तपोवनातील शेकडो झाडे हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या विरोधात पर्यावरणप्रेमी आणि विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, हटवल्या जाणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात नाशिकमध्ये 1000 नवीन झाडे लावण्यात येणार आहेत. मागील पुनर्रोपण मोहिमेमध्ये 60 ते 70% झाडे जगल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत आकडेवारी अजून समोर आलेली नाही. पर्यावरणप्रेमींनी साधूंसाठी तात्पुरत्या राहुट्यांसाठी झाडांची कत्तल का, असा प्रश्न उपस्थित करत एकाही झाडाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या वादामुळे नाशिकची बदनामी होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
Leave a Reply