
आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानावरून जोरदार टीका केली आहे. बाबासाहेब देशमुख मुंबईत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबत असल्याचा दावा त्यांनी केला. जर हा दावा खोटा ठरला, तर आपण निवडणूक सोडून देऊ असे आव्हानही शहाजीबापू पाटील यांनी दिले. “गणपतराव मुंबईत भाकर खायचे, पण आताच्या आमदारांचे शौक वेगळे आहेत,” असे पाटील यांनी म्हटले. त्यांनी बाबासाहेब देशमुखांवर यावरून निशाणा साधला. पाटील यांनी जुन्या काळातील राजकारण्यांच्या साधेपणाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, बाबासाहेबांनी आयुष्यभर भाकरी खाल्ल्या, तर सत्ताबाई साहेबांनी बांधून दिलेल्या भाकरी रेल्वेच्या डब्यात खाल्ल्या. मुंबईत गेल्यावर गावठी माणसे त्यांच्यासाठी भाकरी घेऊन यायची. या तुलनेत आताचे आमदार फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये राहत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Leave a Reply