
अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. साधुग्राम आणि कथित प्रदर्शन केंद्राच्या उभारणीसाठी झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना त्यांनी विरोध दर्शवला. नाशिकमधील पर्यावरणप्रेमींना पाठिंबा देण्यासाठी ते स्वतः उपस्थित होते. गेल्या १० वर्षांपासून ते पर्यावरणाच्या कामात सक्रिय असून, उद्यान विभागाच्या कार्यपद्धतीवर सयाजी शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.
सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केले की, आमचे झाड म्हणजे आमचे आई-वडील आहेत. जर त्यांच्यावर हल्ला झाला, तर आम्ही शांत बसणार नाही. झाडे तोडणे हा ज्ञानेश्वर, तुकाराम आणि शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचे ते म्हणाले. प्रशासनाने पर्यायी जागेचा वापर करावा, अशी मागणी सयाजी शिंदे यांनी केली. गिरीश महाजन यांनी १५,००० झाडे लावण्याच्या केलेल्या विधानावर त्यांनी पूर्वीच्या ३३ कोटी झाडांच्या आश्वासनाची आठवण करून दिली. झाडे असतील तरच माणूस आहे, असे सांगत, एकही झाड तुटू देणार नाही या भूमिकेवर ते मरेपर्यंत ठाम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply