• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Premanand Maharaj: मृत्यूनंतर कुटुंबियांसोबतचे नाते कायम राहते? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं?

December 15, 2025 by admin Leave a Comment


जीवन आणि मृत्यू हे या जगातील फार मोठे सत्य आहे. जीवन आणि मृत्यू सत्य असल्याबरोबरच एक असे रहस्यही आहे, जे आजपर्यंत कोणालाही समजलेले नाहीत. प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजनांशी जोडलेली असते. अशा वेळी मनात हा प्रश्न नक्कीच येतो की मृत्यूनंतरही संबंध शिल्लक राहतात का? आत्म्याला आपले कुटुंब, आपली ओळख आणि भावना आठवतात का?
अशाच प्रकारचा प्रश्न एका महिलेने प्रेमानंद महाराजांना विचारला. तिने महाराजांना विचारलं की मृत्यूनंतर कुटुंबियांसोबतचे नाते कायम राहते का की एकदम तुटते? प्रेमानंद महाराजांनी या प्रश्नाचं सोपं उत्तर देत सर्वांचे लक्ष वेधले. सांगितलं की मृत्यू सर्व संबंध तोडून टाकतो. मृत्यू ही अशी अवस्था आहे जी खोल झोपेपेक्षाही जास्त विस्मरण आणणारी असते. खोल झोपेत व्यक्तीला काहीच आठवत नाही.

मृत्यूनंतर कोणतीही आठवण शिल्लक राहत नाही – प्रेमानंद महाराज

प्रेमानंद महाराजांनी सांगितले की मृत्यू सर्व संबंध तोडून टाकतो. मृत्यू ही अशी अवस्था आहे जी खोल झोपेपेक्षाही जास्त विस्मरण आणणारी असते. खोल झोपेत व्यक्तीला काहीच आठवत नाही. प्रेमानंद महाराज म्हणाले की त्याचप्रमाणे मृत्यूनंतरही कोणत्याही प्रकारची आठवण शिल्लक राहत नाही. त्यांनी पुढे सांगितलं की खोल झोपेत व्यक्तीला संस्कारांमुळे काही स्वप्ने दिसतात, पण गाढ निद्रेत काहीच आठवत नाही. मृत्यू त्याहूनही खोल अवस्था मानली जाते, जिथे सर्व प्रकारच्या आठवणी संपुष्टात येतात. आईच्या गर्भात मूल नऊ महिने राहते, पण बाहेर आल्यानंतर त्याला काहीच आठवत नाही.

आत्मा कर्मांचा प्रभाव सोबत घेऊन जाते

अशा प्रकारे व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सांसारिक मोह कमी होतो. ना कुटुंब, ना पत्नी-मुले, ना संपत्ती, ना बँक बॅलन्स, ना पद-प्रतिष्ठा, सर्व काही मृत्यूबरोबरच संपून जाते. आत्म्याबरोबर प्रवासात फक्त त्याच्या कर्मांचा प्रभाव जातो. बाकी सर्व संबंध आणि ओळख संपुष्टात येते. व्यक्ती जगात आल्यानंतरच त्याचे संबंध सुरू होतात. प्रेमानंद महाराजांनी सांगितलं की संबंधांचा आधार शरीर आणि परिस्थिती असते. जेव्हा व्यक्तीचे शरीर संपते, तेव्हाच संबंधांचे बंधनही संपुष्टात येते.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 Auction : 369 खेळाडूंची जबाबदारी, कोण आहेत ऑक्शनर मल्लिका सागर?
  • Video: अनुष्काच्या डोळ्यात पाणी, विराटने जोडले हात… प्रेमानंद महाराजांच्या मठात नेमकं काय घडलं?
  • हे प्रचंड संतापजनक… या मुख्यमंत्र्यांनी मंचावर ओढला महिलेचा बुरखा… Video समोर येताच संतापाची लाट
  • Ambani Family : एकेकाळी झाडू – फरशी पुसणारा ‘तो’ अंबानी कुटुंबियांमुळे झालाय मालामाल, पण कसं?
  • Mumbai BMC Election: जे हिंदुत्वाचे नाही झाले.. ते मराठी माणसाचे… ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या ‘त्या’ बॅनरची तुफान चर्चा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in