• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai Air Pollution: मुंबईतील खराब हवेसाठी इथिओपियातील ज्वालामुखीवर खापर फोडू नका, हायकोर्टाचे प्रदूषणावरून सरकारला खडे बोल

November 28, 2025 by admin Leave a Comment


Mumbai Bad Air: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. मुंबईत दृश्यमानता कमी झाली आहे. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतलेली आहे. इथिओपियात ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि त्याची राख वाहत आली आहे. त्यामुळे मुंबईत हवेची गुणवत्ता खालवल्याचा दावा सरकारी पक्षाने यावेळी केला. त्यावर हायकोर्टाने सरकारचे कान टोचले. या घटनेपूर्वी शहरातील हवा खराब होती असे न्यायालयाने सुनावले. शहरातील हवेचा दर्जा खराबच होता अशा शब्दात गुरुवारी हायकोर्टाने खडसावले. आज या प्रकरणात पुन्हा सुनावणी होणार आहे.

इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडले खापर

दोन दिवसांपूर्वी इथिओपियातील ज्वालामुखी उद्रेक झाला. त्यातून राख बाहेर पडली. राखेचे ढग आफ्रिकेसह आशियाकडे सरकले. भारतात हे राखेचे ढग आले. त्यामुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावला अशी बाजू अतिरिक्त सरकारी वकिलांनी मांडली. मात्र न्यायालयाने सरकारचा हा दावा फेटाळला. दोन दिवसांपूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक झाला नव्हता. तरीही हवेचा दर्जा खराब होता असे हायकोर्टाने सुनावले.

हवेचा निर्देशांक 300 पेक्षा अधिक

मुंबईतील हवेचा निर्देशांक सातत्याने घसरत आहे. शहरातील हवेचा निर्देशांक 300 पेक्षा अधिक आहे असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील डी. खंबाटा यांनी केला. यामुळे हवा खराब झालीच आहे. पण दृश्यमानता पण घसरली आहे. अगदी जवळचे सुद्धा योग्य दिसत नसल्याचे म्हणणे मांडण्यात आले. याची न्यायालयाने दखल घेतली.

इथिओपियातील ज्वालामुखी उद्रेकापूर्वीही मुंबईत 500 मीटरच्या पुढील दृश्यमानता कमी होती असा दाखला न्यायालयाने यावेळी दिला. तर या प्रकरणी आता सरकार कोणती उपाय योजना करणार आहे याची विचारणा हायकोर्टाने केली. दिल्लीतील खराब हवेचा संदर्भ देत न्यायालयाने सरकार काय उपाय योजना करणार याविषयी न्यायालयाने प्रश्न विचारला.

ही सुमोटो याचिका यापूर्वी 2023 मध्ये न्यायालयाच्या समोर आली होती. दरम्यान मुंबई महापालिकेचे आयुक्त भुषण गगराणी यांनी सीएनबीएस टीव्ही 18 ला दिलेल्या माहितीनुसार, महापालिका या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. हवेची गुणवत्ता सुधारावी आणि दृश्यमानता वाढावी यासाठी जागोजागी पाणी फवारण्यात येत आहे. रस्ते स्वच्छ करण्यात येत आहेत. तर ज्या प्रकल्पांमुळे वायू प्रदुषण होत आहे ते त्वरीत थांबवण्यास सांगण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अंड्यात लपलेल्या विषामुळे कॅन्सरचा धोका, नायट्रोफ्यूरान अँटीबायोटिक कशात? कसे ओळखावे?
  • शैक्षणिक खर्च वाढला, मुलांच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली, जाणून घ्या
  • सोन्याच भाव धडाम! एका झटक्यात 2000 रुपयांनी स्वस्त, आता 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?
  • IPL Auction: पृथ्वी शॉ पुन्हा एकदा Unsold, आपल्या पोस्टने लक्ष घेतलं वेधून
  • वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेल्या या 5 गोष्टी गरीबी आणू शकतात; तुमच्याही बाथरूममध्ये आहेत का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in