• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटेंना शिक्षा होताच अर्जदाराची मुख्यमंत्री फडणवीसांना एकच कळकळीची विनंती की, साहेब…

December 17, 2025 by admin Leave a Comment


राज्य सरकारमधील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झालं आहे. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी हे अटक वॉरंट निघालं आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्ष कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा झाली आहे. कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता अर्जदार आशुतोष राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे आदेश दिलेला आहे की, त्यानुसार मंत्री कोकाटे यांच्याविरुद्ध अटकेचे आदेश निघाले आहेत. त्वरित पोलिसांसमोर शरण जावं किंवा पोलिसांनी अटक करावी असे न्यायालयीन आदेश निघाले आहेत.कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे” असं अर्जदार आशुतोष राठोड म्हणाले.

“माणिकराव कोकाटे हे कॅबिनेट मंत्री आहेत, न्यायालयाने विचार करावा असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. त्यावर न्यायालयाने स्पष्टपणे निरीक्षण नोंदवलं की, कायद्यापुढे सगळे समान आहेत. एक चांगला संदेश समाजाला दिलेला आहे. या सर्व प्रकरणात दिघोळे साहेबांच्या कन्या अंजली दिघोळे यांनी लढा दिला” असं आशुतोष राठोड म्हणाले.

तब्येतीची सबब कोर्टाने का अमान्य केली?

“कोकाटे हे रुग्णालयात आहेत, असं कोर्टात सांगण्यात आलं. पण त्याचे कागदोपत्री कोणतेही पुरावे दिले नाहीत. कॅबिनेटच्या बैठका झाल्या, नगरपालिका निवडणुकीच्या रॅल्या झाल्या. तिथे माणिकराव कोकाटे हजर होते. त्यामुळे तब्येत खराब असण्याची सबब कोर्टाने अमान्य केली” असं आशुतोष राठोड म्हणाले.

म्हणजे त्वरित आमदारकी रद्द होणार

“माणिकराव कोकाटे यांना पोलिसांनी आता अटक करुन तात्काळ त्यांची रवानगी कारागृहात करावी, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, दोन वर्षांची शिक्षा झाली म्हणजे त्वरित आमदारकी रद्द होणार. त्यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देणं क्रमप्राप्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्यायप्रिय आहेत. मी त्यांना विनंती करीन की, कमीत कमी आता तरी राजीनामा घ्यावा आणि कायद्याचं राज्य आहे, याची प्रचिती द्यावी” असं आशुतोष राठोड म्हणाले.

शासनाची फसवणूक केल्याचं सिद्ध झालं

“सध्या माझी सत्यमेव जयते अशीच भावना आहे. माणिकराव कोकाटेंच्या विरोधीत ही तत्वांची लढाई होती. न्याय जिवंत आहे. कायद्यानुसार न्याय मिळतो. कोर्टाने आदेश दिलाय त्वरित अटक करण्यात यावी” असं आशुतोष राठोड म्हणाले. “मुख्यमंत्री कोट्यातली सदनिका आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचं दाखवून घेतली. शासनाची फसवणूक केल्याचं सिद्ध झालेलं आहे. अटक, आमदारकी रद्द होणं या औपचारिक बाबी राहिल्या आहेत” असं आशुतोष म्हणाले.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जिल्हापरिषद निवडणुकीआधी कायद्यात मोठा बदल, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 सर्वात मोठे निर्णय!
  • जेव्हा चिंतेत सोनिया गांधींनी लावला अटल बिहारी वाजपेयींना फोन…तुम्ही ठीक आहात ना…मग माजी पंतप्रधानांनी काय दिले उत्तर?
  • Vivah Muhurat 2026: मे 2026 पर्यंत लग्नाचे किती आहेत मुहूर्त, पाहा संपूर्ण यादी
  • IPL Auction 2026 : आधी धुरंधर त्यानंतर आता आयपीएल ऑक्शनमधून पाकिस्तानवर स्ट्राइक, PSL चं असं होणार नुकसान
  • Manikrao Kokate : कोकाटेंचे मंत्रिपद जाणार, मग धनंजय मुंडेंसारखी आमदारकी तरी वाचणार का? वाचा काय काय होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in