
वूमन्स टीम इंडियाच्या चिवट बॉलिंगसमोर श्रीलंका सलग तिसऱ्या सामन्यातही (India vs Sri Lanka Women 3rd T20I) ढेर झाली आहे. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला पहिल्या 2 सामन्यात 130 पार पोहचून दिलं नव्हतं. त्यानंतर आता श्रीलंकेला तिसर्या सामन्यात 100 च्या स्ट्राईक रेटनेही धावा करता आल्या नाहीत. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 7 झटके देऊन 112 धावांवर रोखलं. त्यामुळे आता टीम इंडियाला विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी फक्त 113 धावा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल, यात शंका नाही. मात्र श्रीलंका या छोट्या धावसंख्येचा बचाव करताना कशी बॉलिंग करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Leave a Reply